Sai Baba : काशी येथील १० मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून पूजा करणे वर्ज्य


वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे सनातन रक्षक दल संघटनेने तब्बल १० मंदिरांमधून साईबाबांच्या (Sai Baba) मूर्ती हटवल्या आहेत. या मूर्ती सन्मानपूर्वक हटवल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.


यासंदर्भातील माहितीनुसार, काशीच्या बडा गणेश मंदिर, पुरुषोत्तम मंदिर इत्यादी १० प्रमुख मंदिरामधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत.


सनातन रक्षक दलाने याबाबत सांगितले की, आतापर्यंत आम्ही अज्ञानामधून साईबाबांची पूजा करत होतो. आता आम्ही मूर्ती हटवत आहोत. पूर्ण सन्मानासह मंदिर व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची सुरुवात बडा गणेश मंदिर येथून करण्यात आली. सनातन रक्षक दलाच्या सदस्यांनी या मंदिरातील साईबाबांची मूर्ती कापडामध्ये गुंडाळून तिथून बाजूला केली. त्यानंतर इतर मंदिरातील मूर्ती हटवण्याची तयारी सुरू झाली.


साईबाबांच्या मूर्ती हटवण्यामागचे कारण सांगताना सनातन रक्षक दलाने सांगितले की, आम्ही साई बाबांचे विरोधक नाही आहोत. मात्र शास्त्रानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करणे वर्ज्य आहे.


हिंदू धर्मानुसार मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्या स्वरूपात मूर्ती स्थापन केल्या जाऊ शकतात. यापूर्वी देखील शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई पूजेला विरोध केला होता. तर बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनीही साई बाबांच्या पूजेला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, मी साईबाबांचा विरोधक नाही. साईबाबांची महात्मा म्हणून पूजा होऊ शकते. मात्र परमात्मा म्हणून त्यांची पूजा होऊ शकत नाही.

Comments
Add Comment

Narendra Modi : सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, ऊर्जा बाजारातील चढ-उतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या

NEET-UG 2026 Re-Exam : नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर सूचना स्लिप neet.nta.nic.in वर उपलब्ध

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) रविवार २१ जून २०२६ रोजी होणार असलेल्या नीट यूजी २०२६ पुनर्परीक्षेची शहर

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक