Mumbai Local : प्रवाशांनो लक्ष द्या! ५ ऑक्टोबरपासून बदलणार मुंबई लोकलच वेळापत्रक

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय


मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल रेल्वेबाबत सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. अशातच आता रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Trains) वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मरे'च्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार की खोळंबा होणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात रेल्वे फलाटांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे अनेकदा फास्ट लोकल वेटिंगवर असतात आणि ट्रेन सुटायला उशीर होतो. परिणामी या लोकल गाड्यांचे पुढील वेळापत्रक बिघडते आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मध्य रेल्वेने २० जलद मार्गावरील लोकल ट्रेन आता दादर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे वेळापत्रक ६ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.



प्रवाशांची कोंडी कमी होणार


दादर स्थानकात कायम प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे तेथूनच फास्ट लोकल सुटल्यास प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो. या निर्णयामुळे सीएसएमटी स्थानकातील गर्दीही कमी होण्यास मदत होईल.



गाड्यांना होणारा उशीर टळणार


मुंबईतील लोकल प्रवास सुखकारक करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर कम्बाईन कम्युनिकेशन्स बेस्ड कंट्रोल ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे दोन लोकलमधील वेळेचे अंतर १८० सेकंदांवरुन १५० सेकंदांपर्यंत (अडीच मिनिटे) कमी होणार आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही रेल्वेमार्गांवरील गाड्यांना होणारा उशीर टळणार आहे.



पश्चिम रेल्वेमार्गावर १५० लोकल रद्द होणार


पश्चिम रेल्वेमार्गावर सध्या मालाड स्थानकापर्यंत सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. मात्र, हे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ४ ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील लोकल गाड्यांच्या १५० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे.

Comments
Add Comment

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

एकनाथ शिंदे - गणेश नाईक यांच्यात मनोमिलन?

मंत्रालयात बंद दाराआड चर्चा; नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तिढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील