नेपाळमध्ये पुराचा कहर, मृतांची संख्या १७० वर, ४२ जण बेपत्ता

काठमांडू: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्सखलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर आणि भूस्सखलनामुळे आतापर्यंत १७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण बेपत्ता आहेत.


काठमांडूची मुख्य नदी बागमतीने शुक्रवार आणि शनिवार झालेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक पातळी ओलांडली आहे. तेथील परिस्थिती पाहता तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले आहे.



पुरात अडकलेल्या लोकांना केले जात आहे रेस्क्यू


गृह मंत्रालयाचे प्रवक्ता ऋषिराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात पुरामुळे संबंधित घटनांमध्ये १११ लोक जखमी झाले आहेत. पोखरेलने सांगितले की सर्व सुरक्षा एजन्सीच्या मदतीने तपास अभियान सुरू आहे. नेपाळच्या सैन्याने देशभरात अडकलेल्या १६२ लोकांना हवाई मार्गाने काढले आहे. याशिवाय ४००० लोकांना नेपाळी सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.

Comments
Add Comment

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना