नेपाळमध्ये पुराचा कहर, मृतांची संख्या १७० वर, ४२ जण बेपत्ता

काठमांडू: भारताचा शेजारील देश नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्सखलनाची समस्या निर्माण झाली आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागामध्ये अनेक ठिकाणी पुराचे पाणी घुसले आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर आणि भूस्सखलनामुळे आतापर्यंत १७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण बेपत्ता आहेत.


काठमांडूची मुख्य नदी बागमतीने शुक्रवार आणि शनिवार झालेल्या मुसळधार पावसामुळे धोकादायक पातळी ओलांडली आहे. तेथील परिस्थिती पाहता तीन दिवसांसाठी सर्व शाळा आणि कॉलेज बंद करण्यात आले आहे.



पुरात अडकलेल्या लोकांना केले जात आहे रेस्क्यू


गृह मंत्रालयाचे प्रवक्ता ऋषिराम पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात पुरामुळे संबंधित घटनांमध्ये १११ लोक जखमी झाले आहेत. पोखरेलने सांगितले की सर्व सुरक्षा एजन्सीच्या मदतीने तपास अभियान सुरू आहे. नेपाळच्या सैन्याने देशभरात अडकलेल्या १६२ लोकांना हवाई मार्गाने काढले आहे. याशिवाय ४००० लोकांना नेपाळी सैन्य, नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल