IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मयांक यादवची सरप्राईज एंट्री

मुंबई: बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर आगामी मालिकेत मयांक यादवलाही टीम इंडियामध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला, दुसरा सामना ९ ऑक्टोबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना १२ ऑक्टोबरला रंगणार आहे.


काही दिवसांपूर्वी भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवला बुची बाबू स्पर्धेदरम्यान हाताला दुखापत झाली होती. सूर्या आता पूर्णपणे फिट आहे. मिस्ट्री स्पिन गोलंदाज वरूण चक्रवर्ती २०२१मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. ३ वर्षांनी तो पुनरागमन करत आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना विकेटकीपर म्हणून ठेवण्यात आले आहे. सॅमसन याआधी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता.


आयपीएल २०२४मध्ये लखनऊ सुपरजायंट्ससाठी खेळणाऱ्या मयांक यादवलाही पदार्पणाची संधी मिळत आहे. मयांकने आयपीएलच्या सध्याच्या हंगामात सातत्याने १५० किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, मयंक यादव.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून