Share

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे, तो म्हणजे “संसारी असावे सावध”. सावध कुठे राहायचे? कर्माच्या ठिकाणी सावध राहायचे. म्हणजे काय करायचे? एकच करायचे. आपण जे करतो त्याने इतरांना दुःख होता काम नये. आपण जे करतो त्याने इतरांना सुखचं मिळाले पाहिजे. आपण जे करतो त्याने इतरांना आनंदच मिळायला पाहिजे. कमीत कमी अशी इच्छा करायला तरी काय हरकत आहे? लोक सुखी व्हावेत, लोक समृद्ध व्हावेत, लोकांची प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावे अशी इच्छा करायला कोणाच्या पिताश्रींचे काय जाते? लोक हे करत नाहीत, चांगली इच्छा करत नाहीत, या उलट काही वेळेस दुसऱ्याच्या वाईटाची इच्छा करतात. एकमेकांना पाण्यात पाहतात. त्यांना एकमेकांचे भले झालेले पाहावत नाही. एकमेकांची निंदा करतात. कुचेष्टा करतात.

जीवनविद्या मिशनमध्ये येऊनही असे करणारे काही लोक आहेत हे मला माहीत आहे. याचा अर्थ त्यांना जीवनविद्या कळलीच नाही आणि इथे येऊनसुद्धा आमच्या वाट्याला हे का आले असा उलट प्रश्न ते विचारतात. अरे तुम्ही आम्ही सांगितलेले सगळे करता का? संपूर्ण दिवसात एक हजार वेळा विश्वप्रार्थना करता का? संपूर्ण दिवसात एक हजार वेळा विश्वप्रार्थना करणे काही फार कठीण नाही. लक्ष देऊन म्हणा असेही मी सांगत नाही. आत्मविश्वासाने, भक्तीने म्हणा पण म्हणा. किती लोकांना विचारले तर मान डोलावतात, नाही किंवा होय ते तुम्हीच तुमच समजून घ्या. एक हजार वेळा प्रार्थना कशीही केली तरीही ती फळतेच. हे मी का सांगतो आहे.

आपण जीवनात जे काही करतो ते कर्म व निसर्गनियम ह्यांचा जो काही परस्पर संबंध आहे, हे कोणीही लक्षात घेत नाही, म्हणून या सगळ्या अडचणी निर्माण होतात. जीवनविद्येच्या सिद्धांतानुसार तुम्ही एकदा कर्म केले की, निसर्गनियम क्रियाशील होतात. म्हणजेच त्या क्रियेला प्रतिक्रिया देऊ लागतात. क्रिया तशी प्रतिक्रिया. आपण कर्म केले की, त्याची प्रतिक्रिया येणारच. कधी येईल? आज, उद्या येईल. पण प्रतिक्रिया येणारच. पुष्कळ वेळा यावर उपाय असतो तो म्हणजे संवाद. संवाद केला की प्रतिक्रिया सौम्य होते व नियती बळकट होते. हा संवाद म्हणजेच विश्वप्रार्थना.

सांगायचा मुद्दा कर्म महत्त्वाचे हे आपण विसरलो तर आपल्या वाट्याला कर्मभोग येतात. कळले की नाही. कर्म आपल्या जीवनात महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे काळजी घेतली पाहिजे. संसारी असावे, सावध तर सावध कधी आणि कुठे? कर्म करताना सावध. माझे प्रत्येक कर्म असे असले पाहिजे की, त्यातून इतरांना सुख आणि आनंद मिळाला पाहिजे. आपण हे करतो का, हे प्रत्येकाने बघावे.

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

59 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago