Devendra Fadnavis: भय्या! "देवेंदर नहीं, देवेंद्र.. ; फडणवीसांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा!

मुंबई : महाराष्ट्रामधील भाजपाचे सर्वात महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अभ्यासू वृत्ती व हजरजबाबीपणा सर्वशृतच आहे. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसते तशीच ती विधानसभेच्या पटलावरही मुद्दा समजावून सांगण्याची त्यांची हातोटी दिसून येते. देवेंद्र फडणवीस अत्यंत क्लिष्ट व अडचणीच्या राजकीय प्रश्नांवरही अनेकदा मुलाखतींमध्ये याच वृत्तीमुळे मिश्किलपणे उत्तर देताना आढळतात. त्यांचा हाच स्वभाव नुकत्याच त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये दिसून आला.


देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक सविस्तर मुलाखत दिली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर या मुलाखतीमध्ये त्यांनी भाष्य केलं. त्यात अजित पवारांशी केलेली युती, लोकसभा निवडणुकीतील अपयश, त्यानंतरची टीका, विधानसभा निवडणुकीची तयारी अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. मात्र, मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीवर सर्व उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!




देवेंदर नाही, देवेंद्र!



मुलाखतीच्या सुरुवातीलाच मुलाखतकार पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना व त्यांना संबोधताना ‘देवेंद्र’ असं न म्हणता ‘देवेंदर भाई’ म्हणून उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रश्न पुढे पूर्ण करण्याआधीच त्यांना हटकलं. “एक रिक्वेस्ट करता हूँ. देवेंदर नहीं, देवेंद्र. शुद्ध मराठी आदमी हूँ भय्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्य बहरून आलं. फडणवीसांच्या या हजरजबाबीपणाला प्रश्न विचारणाऱ्यांनी खळखळून हसून दाद दिली.



दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत त्यांनी वक्तव्य केलं. या निवडणुकीत भाजपाच्या राज्यातील जागा २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्यावरून भाजपामध्ये कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली असताना फडणवीसांनी त्यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. राज्यात भाजपा कमजोर झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.




Comments
Add Comment

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :