मुंबई : महाराष्ट्रामधील भाजपाचे सर्वात महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अभ्यासू वृत्ती व हजरजबाबीपणा सर्वशृतच आहे. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसते तशीच ती विधानसभेच्या पटलावरही मुद्दा समजावून सांगण्याची त्यांची हातोटी दिसून येते. देवेंद्र फडणवीस अत्यंत क्लिष्ट व अडचणीच्या राजकीय प्रश्नांवरही अनेकदा मुलाखतींमध्ये याच वृत्तीमुळे मिश्किलपणे उत्तर देताना आढळतात. त्यांचा हाच स्वभाव नुकत्याच त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये दिसून आला.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक सविस्तर मुलाखत दिली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर या मुलाखतीमध्ये त्यांनी भाष्य केलं. त्यात अजित पवारांशी केलेली युती, लोकसभा निवडणुकीतील अपयश, त्यानंतरची टीका, विधानसभा निवडणुकीची तयारी अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. मात्र, मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीवर सर्व उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!
मुलाखतीच्या सुरुवातीलाच मुलाखतकार पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना व त्यांना संबोधताना ‘देवेंद्र’ असं न म्हणता ‘देवेंदर भाई’ म्हणून उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रश्न पुढे पूर्ण करण्याआधीच त्यांना हटकलं. “एक रिक्वेस्ट करता हूँ. देवेंदर नहीं, देवेंद्र. शुद्ध मराठी आदमी हूँ भय्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्य बहरून आलं. फडणवीसांच्या या हजरजबाबीपणाला प्रश्न विचारणाऱ्यांनी खळखळून हसून दाद दिली.
दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत त्यांनी वक्तव्य केलं. या निवडणुकीत भाजपाच्या राज्यातील जागा २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्यावरून भाजपामध्ये कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली असताना फडणवीसांनी त्यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. राज्यात भाजपा कमजोर झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…