कणकवलीत निघणार ५ ऑक्टोबरला भव्य ‘आरक्षण बचाव रॅली’

  61

आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा निर्धार असल्याचा आमदार नितेश राणेंचा आरोप


कणकवली : काँग्रेस पक्षाची भारत देशात सत्ता आली तर काँग्रेस आरक्षण व्यवस्थाच संपवून टाकणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे, तो संपवून टाकण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण घालवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून आम्ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते ,आमदार नितेश राणे यांनी दिली.


येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, राहूल गांधींचे वक्तव्य हे संविधानाने एससी, एसटी, एनटी वा इतर समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिलेला आहे, तो संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला दिसतो. आरक्षण संपविण्याचे काम राहूल गांधी व काँग्रेसकडून होईल असे दिसून येते. आम्ही याला विरोध करणार असून काही झाले तरी भारत देशातील आरक्षण घालवू देणार नाही, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जानवली पुलाकडून ही रॅली सुरू होणार आहे.



लोकसभा निवडणूकीच्या वेळी विरोधकांकडून अपप्रचार


लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी चूकीच्या पद्धतीने प्रचार करून पंतप्रधान संविधान विरोधी म्हणून काहींनी प्रचार केला. पंतप्रधानांनी तसे कोणतेही वक्तव्य केलेले नसतानाही जे कुणी बोललेही नाही वा कुणाच्या मनातही नाही, ते खोटे पसरविण्याचे काम करण्यात आले होते. समाजात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता तर आरक्षण संपविण्याची भाषा राहूल गांधी यांनी स्वतःच केली असून यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकणार? म्हणूनच याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले.

Comments
Add Comment

तीन महिन्यात पुणे एसटी विभागाने केली कोट्यवधींची कमाई

पुणे : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध भागांतील नागरिकांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी तब्बल २५ लाख किमीचा प्रवास

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

Israel-Hamas: इस्रायली सैन्याचे गाझावर हवाई हल्ले! संघर्ष पुन्हा पेटला

हमासच्या नौदल कमांडरसह तीन सैनिक ठार इस्रायल सैन्याने (आयडीएफ)  पुन्हा गाझा येथे हवाई हल्ला करत हमासच्या नौदल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

हृदयद्रावक घटना: व्यायामादरम्यान 15 वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या प्रवीण धायगुडे (वय १५)

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात