कणकवलीत निघणार ५ ऑक्टोबरला भव्य ‘आरक्षण बचाव रॅली’

आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा निर्धार असल्याचा आमदार नितेश राणेंचा आरोप


कणकवली : काँग्रेस पक्षाची भारत देशात सत्ता आली तर काँग्रेस आरक्षण व्यवस्थाच संपवून टाकणार असे वक्तव्य विरोधी पक्षनेता व काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा जो हक्क दिलेला आहे, तो संपवून टाकण्याचा निर्धारच राहुल गांधी यांनी केलेला दिसतो. आरक्षण हा आमचा हक्क असून आम्ही आरक्षण घालवू देणार नाही. म्हणूनच महायुतीच्या माध्यमातून आम्ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कणकवली येथे विधानसभा क्षेत्रासाठीची भव्य आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते ,आमदार नितेश राणे यांनी दिली.


येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, राहूल गांधींचे वक्तव्य हे संविधानाने एससी, एसटी, एनटी वा इतर समाजाला जो आरक्षणाचा हक्क दिलेला आहे, तो संपुष्टात आणण्याचा निर्धार केलेला दिसतो. आरक्षण संपविण्याचे काम राहूल गांधी व काँग्रेसकडून होईल असे दिसून येते. आम्ही याला विरोध करणार असून काही झाले तरी भारत देशातील आरक्षण घालवू देणार नाही, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगितले. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. जानवली पुलाकडून ही रॅली सुरू होणार आहे.



लोकसभा निवडणूकीच्या वेळी विरोधकांकडून अपप्रचार


लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी चूकीच्या पद्धतीने प्रचार करून पंतप्रधान संविधान विरोधी म्हणून काहींनी प्रचार केला. पंतप्रधानांनी तसे कोणतेही वक्तव्य केलेले नसतानाही जे कुणी बोललेही नाही वा कुणाच्या मनातही नाही, ते खोटे पसरविण्याचे काम करण्यात आले होते. समाजात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता तर आरक्षण संपविण्याची भाषा राहूल गांधी यांनी स्वतःच केली असून यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकणार? म्हणूनच याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येत या आरक्षण बचाव रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन आमदार राणे यांनी केले.

Comments
Add Comment

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

भारतीय सिनेमाचा अभिमान ‘बूंग’ ६ मार्चला पुन्हा रिलीज, ट्रेलर झाला प्रदर्शित

एक्सेल एंटरटेनमेंट, चॉकबोर्ड एंटरटेनमेंट आणि सूटेबल पिक्चर्स यांची BAFTA जिंकणारी पहिली भारतीय फिल्म ‘बूंग’ ६

माजी खासदाराचे निधन, मुख्यमंत्र्यांनी पाठवला शोकसंदेश

लातूर : लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार, माजी कुलगुरू आणि प्रख्यात विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे यांचे