Jioच्या या प्लान्सने महिन्याभराचे रिचार्जचे टेन्शन जाईल संपून

मुंबई: या वर्षी जुलै महिन्यात भारताच्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली होती. या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पद्धतीच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली.

रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेक युजर्सला आजपर्यंत हे समजलेले नाही की स्वस्त प्लान्स किती रूपयांचे आहे. यात आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लान्सबद्दल सांगत आहोत. यामुळे महिन्याभराचे टेन्शन कमी होईल.

१८९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी १५५ रूपयांचा होता मात्र याची किंमत १८९ रूपये झाली आहे. या प्लानच्या सुविधा

डेटा: २जीबी डेटा
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२४९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २०९ रूपयांचा होता. याची किंमत आता २४९ रूपये झाली आहे. यातील सुविधा

डेटा: १ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२९९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २३९ रूपयांचा होता मात्र आता याची किंमत २९९ रूपये झाली आहे. या प्लानमधील सुविधा

डेटा: १.५ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

हे सध्याच्या घडीला जिओचे सगळ्यात कमी रिचार्जवाले प्लान्स आहेत. यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जर तुम्ही फोनसाठी २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत आहोत तर तुम्हाला कमीत कमी १८९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करावा लागेल.
Comments
Add Comment

सोशल मीडियावर महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे भोवणार

गृहमंत्रालयासोबत समन्वय साधून कठोर कारवाईचे मंत्री आदिती तटकरे यांचे संकेत मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून

कंत्राटदारांकडून वेळेत बस न मिळाल्याने मुंबईत 'बेस्ट'चा तुटवडा

राज्यमंत्र्यांची कबुली; स्क्रॅपिंग पॉलिसीचाही बेस्टला मोठा फटका मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते महामंडळे पुढील अधिवेशनाच्या आत स्थापन करणार

-- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; पत्रकारांच्या समस्यांवर व्यापक बैठक घेणार मुंबई : पत्रकार आणि वृत्तपत्र

बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपनीचा तात्पुरता परवाना रद्द..-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : मुंबई व आसपासच्या भागात वाढत असलेल्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर

Navi Mumbai : सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राडा; अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना मारहाण

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण मिळाले. नवीन पनवेल सेक्टर १४ येथील

९ मार्च पासून नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती..

-- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा मुंबई : वाढती वाहतूक कोंडी रोखणे व शहरी प्रदूषणाला आळा