Jioच्या या प्लान्सने महिन्याभराचे रिचार्जचे टेन्शन जाईल संपून

मुंबई: या वर्षी जुलै महिन्यात भारताच्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली होती. या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पद्धतीच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली.

रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेक युजर्सला आजपर्यंत हे समजलेले नाही की स्वस्त प्लान्स किती रूपयांचे आहे. यात आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लान्सबद्दल सांगत आहोत. यामुळे महिन्याभराचे टेन्शन कमी होईल.

१८९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी १५५ रूपयांचा होता मात्र याची किंमत १८९ रूपये झाली आहे. या प्लानच्या सुविधा

डेटा: २जीबी डेटा
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२४९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २०९ रूपयांचा होता. याची किंमत आता २४९ रूपये झाली आहे. यातील सुविधा

डेटा: १ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

२९९ रूपयांचा प्लान


हा प्लान आधी २३९ रूपयांचा होता मात्र आता याची किंमत २९९ रूपये झाली आहे. या प्लानमधील सुविधा

डेटा: १.५ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस

हे सध्याच्या घडीला जिओचे सगळ्यात कमी रिचार्जवाले प्लान्स आहेत. यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जर तुम्ही फोनसाठी २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत आहोत तर तुम्हाला कमीत कमी १८९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करावा लागेल.
Comments
Add Comment

BMC : बीकेसीतील स्वच्छतेची महापालिकेला काळजी, यांत्रिक झाडूद्वारे केली जाते साफसफाई

- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात

Malad West Flyover : मालाड पश्चिम उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाच्या कंत्राटात महापालिकेचा अनोखा प्रयोग

- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काम मुंबई (सचिन

Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील