Tirupati Laddu : जनावराच्या चरबीनंतर आता तंबाखू? तिरुपती बालाजीच्या प्रसादाबाबत अजून एक VIDEO व्हायरल

खम्माम : आंध्र प्रदेशयेथील तिरुपती मधील श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये जनावरांच्या चरबीचा आणि निकृष्ट दर्जाच्या तूपाचा वापर केला जात होता, असं म्हणत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर खूप गंभीर आरोप केला आहे. चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पाठोपाठ लाडवांच्या नमुन्यामध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) शुक्रवारी सांगितले. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतायत. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirupati Balaji) हे जगभरात प्रसिद्ध आहे. अशातच या ठिकाणी असलेले प्रसादाचे लाडू हे अतिशय पवित्र मानले जातात. दरम्यान, या लाडवांमध्ये आता तंबाखू आढळल्याचा दावा एका भाविकाने केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा येथील खम्माम जिल्ह्यातील रहिवासी दोंतू पद्मावती यांनी दावा हा केला आहे की तिरुपती मंदिरातून प्रसाद म्हणून मिळालेल्या लाडवांमध्ये त्यांना तंबाखूची पुडी आढळली आहे. या महिलेने म्हटलं आहे की तिने प्रसादात मिळालेले लाडू घरी नेले होते. मात्र, तंबाखूची कागदाची पुडी त्या लाडवांमध्ये आढळली आहे. याचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. (आम्ही या व्हिडीओची पुष्टी केलेली नाहीये.)




पद्मावती काय म्हणाल्या ?


दोंतू पद्मावती या खम्माम जिल्ह्यातील कार्तिकेय परिसरात राहणाऱ्या १९ सप्टेंबर रोजी तिरुमाला मंदिरात गेल्या होत्या. प्रत्येक भक्ताप्रमाणे तिथे जाणाऱ्या पद्मावती यांना देखील तिथे प्रसाद मिळाला होता. तो प्रसाद त्यांनी घरी नेला आणि कुटुंबातील सदस्यांसोबतच नातेवाईक व शेजाऱ्यांना वाटला. पद्मावती म्हणाल्या, “आम्ही लाडूचं पाकीट उघडलं, लोकांमध्ये वाटण्यासाठी लाडूचे तुकडे केले. त्यावेळी कागदाच्या पुडीत बांधलेली तंबाखू आम्हाला त्यामध्ये आढळली. लाडवामध्ये तंबाखू असल्याचं पाहून आम्हा सर्वांना धक्का बसला. हा प्रसाद पवित्र असेल असं आम्हाला वाटलेलं, मात्र प्रसादात तंबाखू असल्याचं बघून आम्हा सर्वांनाच खूप वाईट वाटलं”. दरम्यान पद्मावती यांनी केलेल्या या दाव्याने सर्वानाच धक्का बसला आहे.




चंद्राबाबू नायडूंचा नेमका आरोप काय?


चंद्राबाबू नायडू म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये जेव्हा वायएसआर काँग्रेस पक्ष सत्तेत होता तेव्हा त्यांनी पवित्र मानल्या जाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानचं (Tirupati Balaji) पावित्र्य घालवून टाकलं. मंदिरातर्फे जे अन्नदान केलं जातं अर्थात‘अन्नदानम’ त्याच्या दर्जाची पातळीही काँग्रेसच्या काळात खालावलेली होती. तिरुमला तिरुपती देवस्थान येथील लाडू हे पवित्र प्रसाद म्हणून मानले जातात. या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला. सरकार आमचं आल्यापासून आम्ही शुद्ध तुपातील लाडू तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंदिरातील अन्नदानात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जाही आम्ही खूप सुधारला आहे.



Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा