आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार; मुलुंड येथे भव्य मोर्चा

Share

मुलुंड : धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यामागणीसाठी तसेच पंढरपूर येथे उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवाना पाठींबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मुलुंड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यात धनगड‌ जमात अस्तित्त्वात नसून त्या ऐवजी धनगर समाज आहेत, असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्चन्यायालयात दिले आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा, मुंबई उच्च न्यायालयात धनगर एसटी आरक्षणाची केस सुरु होती. त्यामध्ये धनगड अस्तित्त्वात नाहीत, असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील खिलारे नावाच्या बांधवांनी धनगडाचे बनावट दाखले काढल्याने धनगडाची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली. म्हणून राज्य सरकारने तत्काळ धनगडाचे दाखले रद्द करावे, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जीआर राज्य सरकारने तत्काळ काढवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्रातील जिल्हाधिका-यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्त्वात नसून अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर, असे गृहित धरुन धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे दाखले वितरीत करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. तसेच धनगर समाजाच्या या मागणीला स्थानिक आमदार म्हणून मिहीर कोटेजा यांनी पत्र काढून पाठींबा जाहीर करावा अशी विनंती देखील समाजबांधवानी आमदार मिहीर कोटेजा यांना निवेदन देऊन केली.

याप्रसंगी, सकल धनगर समाजाच्या सहभागी कार्यकर्त्यांनी सरकार विरुध्द जोरदार घोषणा देत एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा आगामी काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

7 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

8 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

10 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

22 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

26 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

56 minutes ago