सुपारीच्या झाडांची खोडे कुजल्याने बागायतदार अडचणीत!

  75

नांदगाव मुरुड : वातावरणातील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे वाढत चाललेल्या तापमानाचा फटका मुरुड तालुक्यातील सुपारी पिकाला बसत असून जूनपासून सतत पडत असलेला पाऊस व प्रखर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम सुपारी झाडांच्या खोडावर होत आहे. त्यामुळे त्यांची खोडे कुजल्याने ती कधी उन्मळून पडतील याचा नेम तर नाहीच. शिवाय एका बाजूने खोड कुजण्याचा परिणाम सुपारी पिकांवर झाला आहे.


मजगावच्या डोंगर भागातील आपल्या मालकीच्या माळरान जमिनीवर येथील वसीम तांडेल यांनी तीनचार वर्षांपूर्वी लागवड केलेली सुपारीची झाडे आता उत्पादनक्षम झाली असताना झाडांच्या ज्या भागात कडक उन्हाच्या तीव्रतेची झळ बसते, तो भाग तडकल्याने त्यात पावसाचे पाणी झिरपून झाडाचे खोड कुजले.परिणामी झाडे कमकुवत होऊन त्यातील काही वाळून गेली आहेत. तर काही जेमतेम तग धरून आहेत.त्याचा उत्पादकतेवरही परिणाम झाला आहे.गेली तीन चार वर्षे रोपांच्या लागवडीपासून मोठ्या मेहनतीने जपलेली ही रोपे ऐन उमेदीच्या काळातच या विचित्र प्रकारच्या रोगामुळे केलेली मेहनत व खर्चावर पाणी पेरले जात असल्याने. येथील सुपारी बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.


तसे सुपारीचे झाड हे उंच़़च उंच वाढत असले तरी ते अतिशय नाजूक असते.सुपारी फळांपासून रोपे तयार करतांना रोप जसे वाढते त्याची उन्हाकडील बाजू पाहूनच जशाच्या तशा स्थितीत त्याची पुनर्लागवड करावी लागते अन्यथा उन्हाच्या किरणांचा झाडांच्या एका बाजूला होऊन खोडाला चिरा पडून ती कुजू लागते.याशिवाय लागवड केलेल्या जमिनीतही असलेल्या छोट्या लाल मुंग्या,वाळवी व अळ्याही झाडांना पोखरून उभे झाड अचानक सुकून जाते. त्यासाठी झाडांची लागवड केलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी, ती खडकाळ, रवाळ असल्यासही तिचा परिणाम झाडांवर व पर्यायाने उत्पादनावर होत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.अशा रोगांवर कृषी विद्यापीठाने संशोधन करून त्यावरील उपाय शोधणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या