मातृपक्ष...

हलकं-फुलकं - राजश्री वटे


नेहमीच हा प्रश्न पडतो मनाला... पितृपक्षच का?
मातृपक्ष का नसतो...
देवा...
माहिती आहे मला देवाला चांगली माणसे आवडतात... जीवाभावाची किती माणसं तू बोलावून घेतलीस तुझ्याकडे... जशी तुला हवी असतात, तशी आम्हालाही ती हवी असतात ना...


आई फार प्रेमळ होती रे... तिला तू बोलावून घेतलंस... तुलाही तिच्या प्रेमाचा, मायेचा अनुभव आलाच असेल. फार सुगरण हं... खाल्लंच असशील तिच्या हातचं... खाल्ल्यावर तिच्या पदराला हात पुसला की नाही... वेगळंच सुख असतं त्यात!
करून बघ... एकदम भारी वाटतं!
असे म्हणतात देवा...
की देव सगळीकडे तर जाऊ शकत नाही म्हणून त्याने आईचं रूप घेतलं आहे. खरंच, तिच्या रूपात साक्षात भगवंताचा सहवास लाभतो!


जन्म होतो... सुरुवातीची दोन अडीच वर्षे नीट बोलताही येत नसतं... आईशी संवाद फक्त तिच्या प्रेमळ स्पर्शातून होत असतो. नंतर या जगात जगण्यासाठीचा प्रवास सुरू होतो. शिक्षण... नोकरी...
अमुक तमुक... यात व्यस्त होतं जातं आयुष्य... तिच्याच जवळ असतो पण हवा तसा संवाद घडत नाही... नुसतं धावत राहतो... जेव्हा हे धावणं थांबतं... एक दीर्घ श्वास घेतो... आता आईशी संवाद साधावा निवांत... तिने आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्या असतात... जरा विसावू तिच्याजवळ... सुरकुतलेल्या कष्टाळू पण तरीही तिचा मऊ मुलायम हात हातात घेऊन... तो सुखद स्पर्श सामावून घेऊ तनामनात!


असं वाटतं की, कितीतरी गोष्टी राहून गेलेल्या त्या पूर्ण कराव्यात तिच्यासाठी... काही चुकलं असेल तर माफी सुद्धा मागायची होती... पण नेमकं तेव्हाच तू बोलावून घ्यावस तिला... तुला सुद्धा हेवा वाटला!


देवा... पण तू बघ... तुझ्यावरही ती तेवढच प्रेम करत असेल जेव्हढे तिच्या लेकरांवर करते. शेवटी ती माय आहे... तिची माया कधीच आटत नाही! तिच्या सहवासात जे प्रेम वाट्याला आले... आता ते तुला मिळत आहे...
नीट सांभाळ तिला...
म्हणतातच ना...
स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी!!

Comments
Add Comment

गाईमुळे वाघाचा उद्धार

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्मपुराणातील एका कथेनुसार प्राचीन काळी एक प्रभंजन नावाचा धर्मपरायण राजा

ट्रोलिंग : दुसऱ्याला दुखावण्याचा परवाना नव्हे!

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. व्यक्त होण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि समाजात

हम प्यार का सौदा करते हैं एक बार...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे काही गाणी लोकप्रिय होतात ती एखाद्या गायकाच्या गायकीमुळे, काही लोकप्रिय होतात

मित्र नको; बाबाच बना!

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू टीनएजमधल्या मुलांशी वागावं तरी कसं याबाबतीत मागील लेखात आपण किशोरावस्थेतील

सुधारणांच्या वाटेवर..

वेध : कैलास ठोळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मते भारताने ‌‘रिफॉर्म एक्सप्रेस‌’मध्ये प्रवेश केला आहे.

सामान्य माणूस खरोखर दखलपात्र आहे?

दखल : महेश धर्माधिकारी  सामान्य माणसासाठी मतदान करणे हा हक्क आणि राष्ट्रीय कर्तव्यही असते. बोटाला शाई लावलेले