शुभमन गिलने झळकवले आपल्या कारकिर्दीतले ५वे शतक

चेन्नई : बांगलादेश विरुद्धात चेन्नई सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपल्या कारकिर्दीतले ५ वे शतक झळकावले. गिलने ११९ धावांची नाबाद खेळी केली. गिलच्या ११९ धावांच्या नाबाद खेळीनंतर भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान ठेवले आहे.


टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुभमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या तीन विकेट पडल्यानंतर गिल आणि पंतने भारताचा डाव सावरला. टीम इंडियाने अवघ्या ६७ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या होत्या.


त्यानंतर पंत आणि गिलने ४थ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला.


गिलचे या वर्षामधील हे तिसरे कसोटीचे शतक आहे. यावर्षी तो क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनलाय. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी २-२कसोटी शतके झळकावली आहेत.


Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या