शुभमन गिलने झळकवले आपल्या कारकिर्दीतले ५वे शतक

चेन्नई : बांगलादेश विरुद्धात चेन्नई सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपल्या कारकिर्दीतले ५ वे शतक झळकावले. गिलने ११९ धावांची नाबाद खेळी केली. गिलच्या ११९ धावांच्या नाबाद खेळीनंतर भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान ठेवले आहे.


टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुभमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या तीन विकेट पडल्यानंतर गिल आणि पंतने भारताचा डाव सावरला. टीम इंडियाने अवघ्या ६७ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या होत्या.


त्यानंतर पंत आणि गिलने ४थ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला.


गिलचे या वर्षामधील हे तिसरे कसोटीचे शतक आहे. यावर्षी तो क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनलाय. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी २-२कसोटी शतके झळकावली आहेत.


Comments
Add Comment

Video: शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याने केले नापाक कृत्य, आधी हात मिळवला आणि...

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान अ‍ॅडलेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा

महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर कमबॅकचे आव्हान

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा दुसरा मुकाबला ऍडलेड ओव्हल येथे रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद

आशिया कप ट्रॉफीवरून रणसंग्राम: BCCI vs नक्वी, ट्रॉफीचा तिढा सुटत नाही!

नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची ट्रॉफी सध्या एका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आशियाई