शुभमन गिलने झळकवले आपल्या कारकिर्दीतले ५वे शतक

चेन्नई : बांगलादेश विरुद्धात चेन्नई सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुभमन गिलने आपल्या कारकिर्दीतले ५ वे शतक झळकावले. गिलने ११९ धावांची नाबाद खेळी केली. गिलच्या ११९ धावांच्या नाबाद खेळीनंतर भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे आव्हान ठेवले आहे.


टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुभमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या तीन विकेट पडल्यानंतर गिल आणि पंतने भारताचा डाव सावरला. टीम इंडियाने अवघ्या ६७ धावांमध्येच तीन विकेट गमावल्या होत्या.


त्यानंतर पंत आणि गिलने ४थ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला.


गिलचे या वर्षामधील हे तिसरे कसोटीचे शतक आहे. यावर्षी तो क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनलाय. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी २-२कसोटी शतके झळकावली आहेत.


Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक