काँग्रेसच्या विजय पाटील यांना वसईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता

Share

दीपक मोहिते

विरार : १३३, वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, त्यांच्या उमेदवारीसाठी एका माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी शिफारस केली आहे. या माजी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला गांधी कुटुंबात वजन असल्यामुळे विजय पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

विजय पाटील यांनी २०१९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत त्यांचा पराभव झाला होता, पण समोर आ. हितेंद्र ठाकुर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असताना त्यांनी ७६ हजार ९५५ मताचा पल्ला गाठला होता. तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मायकल फुर्टडो याना केवळ १६ हजार ४६७ मते पडली होती. त्यानंतर २०१९ साली विजय पाटील यांना त्यांच्यापेक्षा अधिक ६० हजार मते मिळाली होती. त्यामुळे यंदा त्यांच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे प्रचंड आर्थिक व मनुष्यबळ आहे, त्यांची ही बाजू त्यांना उमेदवारी मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरणारी आहे.

काँग्रेसतर्फे त्यांना उमेदवारी मिळाल्यास बविआचे आ. हितेंद्र ठाकूर हे हमखास निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. एकेकाळी घनिष्ठ मित्र असलेले या दोघांमधून सध्या विस्तव जात नाही. पण विजय पाटील यांचा पराभव करण्याची संधी आ.ठाकूर सोडतील, असे वाटत नाही.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

23 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

55 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago