लालबागच्या राजाचरणी गणेशोत्सवात भक्तांकडून कोट्यावधींचे दान

मुंबई: मुंबईचा गणेशोत्सव म्हटले की लालबागच्या राजाचे नाव पहिले तोंडावर येते. लालबागचा राजा, नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ओळख आहे. त्यामुळे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भक्तगण आपल्या लाडक्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी येतात.


गणपतीच्या दहा दिवसांत तर लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांची प्रचंड गर्दी असते. दररोज लाखो भाविक राजाचे दर्शन घेतात. तितकेच भरभरून दानही आपल्या राजासाठी अर्पण करतात. दहा दिवसांमध्ये राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या इतकी प्रचंड असते की अनेकदा गर्दीवर नियंत्रण मिळवता येत नाही.


दरम्यान, यंदाची राजाच्या चरणी भक्तांकडून भरभरून दान करण्यात आले आहे. ७ सप्टेंबरला गणपती विराजमान झाले.


गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत लालबागच्या राजाला ५ कोटी ६५ लाख ९० हजार रोख रुपये दान करण्यात आले आहेत. ही केवळ रोख रक्कम आहे. सोने-चांदीचीही मोठ्या प्रमाणात भक्तांकडून दान करण्यात आले आहे.


गणपतीच्या दहा दिवसांमध्ये भक्तांनी तब्बल ४१५१.३६ ग्रॅम सोने राजासाठी अर्पण केले. तर ६४३२१ ग्रॅम चांदी लालबागच्या राजाला अर्पण करण्यात आली.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र