Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागात राहणार पाणीपुरवठा बंद

  129

ठाणे : गणेशोत्सवानंतर महापालिकेने (Municipality) अनेक भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम (Repairing) पुन्हा हाती घेतले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच पाण्याचा जास्तीचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालच पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात दुरुस्तीच्या कामामुळे त्या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता ठाण्यातही (Thane) पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार असून उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.



कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद?


ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

Comments
Add Comment

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा मुंबई :

अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा

सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक

‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे