ठाणे : गणेशोत्सवानंतर महापालिकेने (Municipality) अनेक भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम (Repairing) पुन्हा हाती घेतले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच पाण्याचा जास्तीचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालच पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात दुरुस्तीच्या कामामुळे त्या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता ठाण्यातही (Thane) पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार असून उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…