Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! उद्या 'या' भागात राहणार पाणीपुरवठा बंद

ठाणे : गणेशोत्सवानंतर महापालिकेने (Municipality) अनेक भागातील पाईप लाईन दुरुस्तीचे काम (Repairing) पुन्हा हाती घेतले आहे. यादरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेआधीच पाण्याचा जास्तीचा साठा उपलब्ध करुन ठेवावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. कालच पुणे शहरातील पिंपरी चिंचवड भागात दुरुस्तीच्या कामामुळे त्या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता ठाण्यातही (Thane) पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तासांचा कालावधी लागणार असून उद्या संपूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तर पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.



कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद?


ठाणे महापालिकेअंतर्गत प्रभाग २६ व ३१ चा काही भाग वगळता दिवा, मुंब्रा यासह कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्ग ६१ च्या चौपदरीकरणामुळे वाशी APMC ला फायदा होणार, मुंबईकरांना दूध भाजीपाला आणखी ताजा मिळणार

मुंबई : दररोज मुंबईला प्रामुख्याने कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरुन दूध आणि

मुंबई मेट्रो वनचे तिकीट उबर ॲपवरही उपलब्ध

तिकीट खरेदीचा लागणारा वेळ होणार कमी मुंबई : आता घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेवर प्रवास अधिक

वडाळ्यात उबाठासाठी कठिण परिस्थती; ठाकरे बंधूंची युती झाल्यास मनसेला जागा कुठे सोडायची हा प्रश्न

मुंबई (सचिन धानजी): दक्षिण मध्य मुंबईतील वडाळा विधानसभा हा कोणे एकेकाळी शिवसेना बालेकिल्ला मानला जात होता, परंतु

गोव्यातील नाईटी क्लबला आग, मुंबई अग्निशमन झाले सतर्क

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर २२ ते २८ डिसेंबर दरम्यान दलाची ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हॉटेल्स्,

कचरा खासगीकरणाची फेरनिविदा की वाटाघाटी? अंदाजित दरापेक्षा ३९ ते ६३ टक्के अधिक दराने लावली कंपन्यांनी बोली

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने कचरा उचलून वाहून नेण्यासाठी वाहन आणि मनुष्यबळ पुरवण्याकरता

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही