रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित अजय देवगणच्या (Ajay Devgan) सिंघम अगेन (Singham Again) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. सिंघम पहिला आणि दुसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. हा सिंघम अगेन फ्रेंचायझीचा तिसरा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या याकडे चांगल्याच नजरा लागल्या आहेत. सिंघम अगेन चित्रपट तगड्या स्टारकास्टमुळे प्रचंड चर्चेत आहे. सिंघम अगेन चित्रपटात अजय देवगण, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, करीना कपूर, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि विलनच्या भूमिकेत अर्जून कपूर झळकणार आहे. आता या स्टारकास्टमध्ये बॉलिवूडमधलं आणखी एक नाव जोडलं गेलंय.
रोहित शेट्टीच्या कॉप युनिवर्समध्ये दबंग चुलबुल पांडेची धमाकेदार एन्ट्री होणार आहे. अभिनेता सलमान खान (salman Khan) सिंघम अगेन या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. बॉलिवूडचा दबंग उर्फ चुलबुल पांडे रोहित शेट्टीच्या चित्रपटात धमाका करायला तयार आहे. अजय देवगणचा सिंघम चित्रपट दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यंदाच्या दिवाळीत सिंघमसोबत डबल धमाका करण्यासाठी दबंग चुलबुल पांडेही झळकणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान कॅमिओ करणार आहे. सलमान खान सिंघम फ्रेंचायझीमध्ये दिसणार आहे. रोहित शेट्टीने त्याच्या ॲक्शन चित्रपटाचा भाग होण्यासाठी सलमान खानला राजी केलं आहे. सिंघम अगेन चित्रपटात कॅमिओ भूमिका साकारण्यासाठी भाईजानने होकार दिला आहे.
सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यनने हे टाळण्यासाठी रोहित शेट्टीला फोन करून चित्रपट पुढे ढकलण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. सिंघम अगेन १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला रिलीज करू, असं कार्तिक आर्यनने म्हटलं होतं. दोन्ही चित्रपटांना याचा फायदा बॉक्स ऑफिसवर झाला असता. पण, आता रोहित शेट्टी सिंघम अगेन चित्रपट पुढे ढकलण्याच्या विचारामध्ये नसल्याचं दिसून येत आहे. १ नोव्हेंबरला सिंघम अगेन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…