Shubman Gill : शुभमन गिल शून्यावर बाद; सोशल मीडियावर होतोय ट्रोल!

चेन्नई : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून खेळला गेला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. या सामन्यात भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप ठरली. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले, तर शुबमन गिल खाते न उघडता बाद झाला. तिघांनाही हसन महमूदने बाद केले. यानंतर चाहते शून्यावर बाद झालेल्या शुभमनला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर काही यूजर्स त्याला ‘भारताचा बाबर आझम’ असेही म्हणत आहेत.



शुबमन गिल कसोटीत तिसऱ्यांदा शून्यावर बाद


यावर्षी शुबमन गिलला कसोटीत तिसऱ्यांदा खाते उघडता आले नाही. याआधी इंग्लंडविरुद्ध जानेवारीत हैदराबाद कसोटी आणि फेब्रुवारीत विशाखापट्टणम कसोटीत त्याला खातेही उघडता आले नव्हते. तो पाच वेळा कसोटीत शून्यावर बाद झाला आहे. शुबमनच्या शेवटच्या १० डावातील कामगिरी ०, ११०, ५२, ३८, ९१, ०, १०४, ३४, ० आणि १२ धावा अशी आहे.


बांगलादेशविरुद्ध त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. शुबमन गिलने आतापर्यंत ४७ कसोटी डावांमध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांच्या मदतीने १४९२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३५.५२ इतकी आहे. त्याला कसोटीत पाचही वेळा भारतात खाते उघडता आलेले नाही. विशेष म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याचे तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे.

Comments
Add Comment

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात