गोंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्य!

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


प्रत्येकाने गोंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला फार वाटते. या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची तो जाणीव करून देतो. हेच काम विशेष महत्त्वाचे आहे; कारण दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला एखादा रोग झाला आहे असे समजले तरच मनुष्य त्यातून मोकळा होण्याच्या प्रयत्नाला लागेल; तसे, दोषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्यासाठी रामाची प्रार्थना करून त्याला शरण जाईल. शरणागतावर कृपा करणे हे रामाचे ब्रीदच असल्यामुळे तो त्याला त्यातून सोडवीलच आणि त्याचे काम होऊन जाईल. चांगला वैद्य कोण? तर जो रोग्याला भूक उत्पन्न होईल असे औषध देऊन नंतर त्याला भरपूर खायला देतो आणि ते पचेल असे औषध देऊन त्याला निरोगी आणि सशक्त बनवितो, तसाच माझा राम आहे, म्हणून प्रत्येकाने त्याला एकवार तरी पाहावे असे मला मनापासून वाटते.


मंदिरामध्ये मुक्तद्वार असावे, पण ते कुणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला! भगवंताच्या उत्सवाला थोडे लोक जरी जमले, पण ते नामात राहणारे असले, तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावेत हा हेतू नसावा. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे; म्हणून ते अगदी साधे असावे आणि तिथे उत्तम उपासना चालावी. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे. म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगडमातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न करावा.


भगवंताच्या इच्छेनेच सर्व चालले आहे ही भावना ठेवून, जे येईल त्याला नको म्हणू नये आणि जे येत नाही त्याबद्दल दु:ख करू नये. आपल्याला भगवंताचा विसर पडला आहे. त्याचे स्मरण होण्यासाठी आणि ते सतत टिकविण्यासाठी भगवंताचे उत्सव करणे जरूर आहे. एखाद्या माणसाला पुष्कळ नाती असून तो जसा वेगळा राहू शकतो, त्याप्रमाणे भगवंत सगळ्या ठिकाणी राहूनही आपल्या हृदयात राहू शकतो. तो सूर्याच्या प्रकाशासारखा एके ठिकाणी राहून सर्व ठिकाणी सत्तारूपाने राहातो. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे नि:संशय असते, त्याला दगडाची मूर्तीदेखील देव बनते; भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे, तिच्यामध्ये भेसळ उपयोगाची नाही. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील, त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो, तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो.

Comments
Add Comment

Tips: पूजेच्या वेळी या नियमांचे पालन केल्यास नशीब बदलेल आणि मिळेल लक्ष्मीचा आशीर्वाद

मुंबई: हिंदू धर्मात पूजा-पाठ करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दररोज पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते

Vastu Tips : या वनस्पती घराच्या दारात ठेवणे टाळा, वास्तुशास्त्रानुसार ठरू शकतात अशुभ

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव असतो.

तुळस आणि मनी प्लांट: एकाच ठिकाणी ठेवणे योग्य आहे का?

मुंबई : हिंदू धर्मात तुळस आणि फेंग शुईमध्ये मनी प्लांट या दोन्ही वनस्पतींना विशेष महत्त्व आहे. तुळशीला 'पवित्र'

Horoscope: कन्या राशीत सूर्य गोचर: ‘या’ तीन राशींसाठी धन, यश आणि सन्मानाचा योग!

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह १७ सप्टेंबर २०२५ रोजी आपली राशी बदलून कन्या

Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा या गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

मुंबई: घराची उत्तर दिशा 'या' वस्तूंनी सजवल्यास होईल धनलाभ वास्तुशास्त्रानुसार, घराची उत्तर दिशा ही धन आणि

Navratri 2025 : यंदा नवरात्र ९ दिवसांची नव्हे तर १० दिवसांची! जाणून घ्या खास कारण

दरवर्षी शारदीय नवरात्र भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संपूर्ण नऊ दिवस भक्त दुर्गा देवीचे उपास करतात,