भारताने चीनला त्यांच्याच घरात हरवले, पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा मिळवला खिताब

  52

मुंबई: हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये धमाल करताना खिताब आपल्या नावे केला. फायनल सामन्यात भारतीय संघाची टक्कर मंगळवारी चीनविरुद्ध होती. या सामन्यात विजय मिळवताना भारताला घाम फुटला. मात्र अखेरीस संघाने १-० असा विजय मिळवला.


भारतीय संघासाठी एकमेव गोल चौथ्या क्वार्टरच्या १०व्या मिनिटात डिफेंडर जुगराज सिंहने केला. यांआधी सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराजने मॅचविनिंग गोल करत खिताब आपल्या नावे केला.


हा फायनल सामना चीनच्या हुलबुनबुईरमध्ये होता. याआधी भारतीय संघाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाला ४-१ असे हरवत फायनलमध्ये स्थान मिळवले होते. दुसरीकडे चीनचा संघ पहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र त्यांना खिताब मिळवता आला नाही.



पाकिस्तानने कोरियाला ५-२ असे हरवले


याच दिवशी स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि कोरिया यांच्यात सामना रंगला. यात पाकिस्तानी संघाने ५-२ असा शानदार विजय मिळवत तिसरे स्थान मिळवले.



भारतीय संघाने सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला


भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला आहे. पुरूष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम २०११मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानला हरवत खिताब जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने २०१३, २०१८, २०२३ आणि २०२४चा हंगाम जिंकला आहे. २०१८मध्ये भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत संयुक्त विजेतेपद मिळवले होते.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार