भारताने चीनला त्यांच्याच घरात हरवले, पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा मिळवला खिताब

मुंबई: हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने मंगळवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये धमाल करताना खिताब आपल्या नावे केला. फायनल सामन्यात भारतीय संघाची टक्कर मंगळवारी चीनविरुद्ध होती. या सामन्यात विजय मिळवताना भारताला घाम फुटला. मात्र अखेरीस संघाने १-० असा विजय मिळवला.


भारतीय संघासाठी एकमेव गोल चौथ्या क्वार्टरच्या १०व्या मिनिटात डिफेंडर जुगराज सिंहने केला. यांआधी सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये जुगराजने मॅचविनिंग गोल करत खिताब आपल्या नावे केला.


हा फायनल सामना चीनच्या हुलबुनबुईरमध्ये होता. याआधी भारतीय संघाने दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाला ४-१ असे हरवत फायनलमध्ये स्थान मिळवले होते. दुसरीकडे चीनचा संघ पहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला होता. मात्र त्यांना खिताब मिळवता आला नाही.



पाकिस्तानने कोरियाला ५-२ असे हरवले


याच दिवशी स्पर्धेतील तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तान आणि कोरिया यांच्यात सामना रंगला. यात पाकिस्तानी संघाने ५-२ असा शानदार विजय मिळवत तिसरे स्थान मिळवले.



भारतीय संघाने सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला


भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक ५ वेळा खिताब जिंकला आहे. पुरूष हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला हंगाम २०११मध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानला हरवत खिताब जिंकला होता. यानंतर भारतीय संघाने २०१३, २०१८, २०२३ आणि २०२४चा हंगाम जिंकला आहे. २०१८मध्ये भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत संयुक्त विजेतेपद मिळवले होते.

Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण