IND vs PAK: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ, कर्णधार हरमनप्रीत सिंहचा जलवा

मुंबई: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अशी धूळ चारली आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंहने कमाल करताना दोन गोल केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये खेळवण्यात आला. स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पाचवा विजय आहे. आता टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे.



असा होता सामना


सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पहिल्या क्वार्टरमध्ये ८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने केला. सुरूवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचे त्यानंतर टीम इंडियापुढे काहीच चालले नाही. त्यांना केवळ एकच गोल करता आला.


सामन्यात पिछाडीवर असलेल्या कर्णधार हरमनप्रीत सिंहने १३व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. हा गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून करण्यात आला. या पद्धतीने १५व्या मिनिटाला पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान १-१ असे बरोबरीत राहिले.


त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने भारतासाठी दुसरा गोल १९व्या मिनिटाला केला. कर्णधाराने दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. आता भारताने २-१ अशी आघाडी घेतली. भारताची ही आघाडी कायम राहिली. टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला.

Comments
Add Comment

Shubman Gill Century : कर्णधार शुभमन गिल नावाचं 'वादळ' थांबायचं नाव घेत नाही! वेस्ट इंडिजला धुवून काढत रोहित शर्माचा 'हा' मोठा विक्रम मोडीत काढला.

यशस्वी जैस्वाल पाठोपाठ कर्णधार शुभमन गिलचे शानदार कसोटी शतक नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies 2nd Test Day 2)

हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माचे नाते चर्चेत: एकत्र फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नुकतेच हार्दिक आणि

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज