IND vs PAK: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला चारली धूळ, कर्णधार हरमनप्रीत सिंहचा जलवा

  75

मुंबई: भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अशी धूळ चारली आहे. भारतासाठी कर्णधार हरमनप्रीत सिंहने कमाल करताना दोन गोल केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना शनिवारी हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४मध्ये खेळवण्यात आला. स्पर्धेतील भारतीय संघाचा हा पाचवा विजय आहे. आता टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे.



असा होता सामना


सामन्याच्या सुरूवातीला पाकिस्तानचा दबदबा पाहायला मिळाला. सामन्यातील पहिला गोल पाकिस्तानने केला. हा गोल पहिल्या क्वार्टरमध्ये ८व्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने केला. सुरूवातीला आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानचे त्यानंतर टीम इंडियापुढे काहीच चालले नाही. त्यांना केवळ एकच गोल करता आला.


सामन्यात पिछाडीवर असलेल्या कर्णधार हरमनप्रीत सिंहने १३व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. हा गोल पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून करण्यात आला. या पद्धतीने १५व्या मिनिटाला पहिल्या क्वार्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान १-१ असे बरोबरीत राहिले.


त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने भारतासाठी दुसरा गोल १९व्या मिनिटाला केला. कर्णधाराने दुसरा गोल पेनल्टी कॉर्नरद्वारे केले. आता भारताने २-१ अशी आघाडी घेतली. भारताची ही आघाडी कायम राहिली. टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार