Accident News : १० वर्षानंतर पाळणा हलला; बारशातून परतताना बाळासह कुटुंबावर काळाचा घाला!

मद्यधुंद तरुणांच्या गाडीच्या धडकेत चौघांचा मृत्यू


छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये १० वर्षांनंतर झालेल्या बाळाच्या बारशातून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या दोन तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या कारला जोरदार धडक (Accident) दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आई, बाळ, आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.


ही दुर्घटना वाळुज एमआयडीसी परिसरातील नगर रोडवर घडली. दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणाऱ्या विशाल चव्हाण (२२) आणि कृष्णा केरे (१९) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, हे अपघात गंभीर स्वरूपाचे ठरत आहेत. या प्रकरणाने मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी प्रशासनाकडून जादा बसेसची सोय? बस कुठून कुठे धावणार जाणून घ्या..

पुणे : महाशिवरात्रीनिमित्त पुणे महानगर परिवहन मंडळाकडून भाविकांसाठी विशेष जादा बसेसची सोय ही कऱण्यात आली आहे.

Ambulance Network: महाराष्ट्रात ‘अॅम्बुलन्स’चे जाळे मजबूत होणार; १०० कोटींचा अतिरिक्त निधी

अत्याधुनिक उपकरणांसह रुग्णसेवेचा वेग वाढणार मुंबई : आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा प्रतिसाद अधिक जलद, अचूक आणि

Pandharpur Crime News : पंढरपूर दुहेरी हत्याकांड : अवघ्या १० मिनिटांत मायलेकावर सपासप वार, तपास अधिकारी बदलले अन् असं उकललं पंढरपूरचं हत्याकांड

पंढरपूर : आषाढी वारीच्या पवित्र काळानंतर पंढरपूरला हादरवून सोडणाऱ्या मायलेकाच्या निर्घृण हत्याकांडाचा तपास

Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना