या नंबरवरून येणाऱ्या calls पासून रहा सावध! Reliance jioने ग्राहकांना दिला इशारा

मुंबई: टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा दिला आहे. कंपनीने युजर्सना +92 नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले आहे. देशात सातत्याने वाढत्या घोटाळ्यादरम्यान कंपनीने लोकांना सतर्क केले आहे की अशा कॉल्सपासून सावध राहा नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.



काय दिलाय इशारा


कंपनीने युजर्सला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, +92 अथवा अन्य स्त्रोतांकडून पोलीस अधिकारी बनून आलेले कॉल्स अथवा मेसेजेसपासून सावध राहा. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी १९३०वर कॉल करा अथवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. येथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करतात. या पद्धतीने ते धोका देण्याचा प्रयत्न करतात.



फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय


जर तुम्हाला कुठून कॉल येत असेल आणि ती व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकारी सांगत असेल तर त्या अधिकाऱ्याचा बॅज नंबर, विभागाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मागा. यानंतर या माहितीची फेरतपासणी करा.


याशिवाय तुमचे सामाजिक सुरक्षा नंबर, बँक खात्याची माहिती अथवा क्रेडिट कार्ड विवरण सारखी माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.


जर तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल संशय असेल तर कॉल कट करा अथवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क करा.

Comments
Add Comment

BMC : बीकेसीतील स्वच्छतेची महापालिकेला काळजी, यांत्रिक झाडूद्वारे केली जाते साफसफाई

- वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपयांचा केला जातो खर्च मुंबई (विशेष प्रतिनिधी) वांद्रे कुर्ला संकुलातील संकुलात

Malad West Flyover : मालाड पश्चिम उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरणाच्या कंत्राटात महापालिकेचा अनोखा प्रयोग

- एल अँड टी पात्र, पण नुकसान भरपाईची ३५० कोटी रक्कम वाचवण्यासाठी जे कुमार आरपीएस कंपनीला दिले काम मुंबई (सचिन

Fertilizer Shortage : आखाती देशांतील युद्धामुळे महाराष्ट्रात खतांचा तुटवडा

मुंबई : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या बांधापर्यंत पोहोचले

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील