या नंबरवरून येणाऱ्या calls पासून रहा सावध! Reliance jioने ग्राहकांना दिला इशारा

मुंबई: टेलिकॉम ऑपरेटर रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक इशारा दिला आहे. कंपनीने युजर्सना +92 नंबरवरून येणाऱ्या कॉल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्यास सांगितले आहे. देशात सातत्याने वाढत्या घोटाळ्यादरम्यान कंपनीने लोकांना सतर्क केले आहे की अशा कॉल्सपासून सावध राहा नाहीतर मोठे नुकसान होऊ शकते.



काय दिलाय इशारा


कंपनीने युजर्सला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, +92 अथवा अन्य स्त्रोतांकडून पोलीस अधिकारी बनून आलेले कॉल्स अथवा मेसेजेसपासून सावध राहा. सायबर गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यासाठी १९३०वर कॉल करा अथवा cybercrime.gov.in वर रिपोर्ट करा. येथे गुन्हेगार स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करतात. या पद्धतीने ते धोका देण्याचा प्रयत्न करतात.



फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय


जर तुम्हाला कुठून कॉल येत असेल आणि ती व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकारी सांगत असेल तर त्या अधिकाऱ्याचा बॅज नंबर, विभागाचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मागा. यानंतर या माहितीची फेरतपासणी करा.


याशिवाय तुमचे सामाजिक सुरक्षा नंबर, बँक खात्याची माहिती अथवा क्रेडिट कार्ड विवरण सारखी माहिती कोणालाही फोनवरून देऊ नका.


जर तुम्हाला एखाद्या कॉलबद्दल संशय असेल तर कॉल कट करा अथवा सरळ पोलीस विभागाशी संपर्क करा.

Comments
Add Comment

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच येणार नविन मोनोरेल

मुंबई : मुंबईतील मोनोरेल, अनेक दिवसांपासून वारंवार बिघाड होत असल्याने अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे .

सुझुकीने दुचाकीच्या किमती केल्या कमी; २२ सप्टेंबरपासून नवीन दर लागू

मुंबई : जीएसटी २.० सुधारणांचे संपूर्ण फायदे ग्राहकांना देईल, अशी घोषणा सुझुकी मोटरसायकल इंडियाने केली आहे.

‘आयफोन १७’च्या लाँचवेळी बीकेसी ॲपल स्टोअरमध्ये गोंधळ

मुंबई: बीकेसी 'जिओ सेंटर'मध्ये ॲपलच्या 'आयफोन १७' मालिकेच्या लाँचवेळी खराब गर्दी व्यवस्थापनामुळे शुक्रवारी

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्बची धमकी! पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याची माहिती समोर आली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए