Hartalika 2024: हरतालिकेचा निर्जळ उपवास करताय? 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

  120

गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2024) सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे, पण गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) एक दिवस आधी हरतालिका तृतीया (Hartalika Tritiya) साजरी केली जाते. हिंदू धर्मात हरतालिकेच्या व्रताला विशेष स्थान आहे. स्त्रिया या दिवशी त्यांच्या पतीला दीर्घ आयुष्य, त्यांचे आनंदी आयुष्य आणि आरोग्यासाठी निर्जळ उपवास करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरतालिका उपवास केला जातो. यंदा हरतालिका ६ सप्टेंबरला २०२४ ला येत आहे. हरतालिका तृतीया साजरी करण्यामागे पौराणिक आख्यायिका अशी आहे की, देवी पार्वतीने सर्वात आधी भगवान शंकरासाठी हरतालिकेचं व्रत केलं होतं. हरतालिका हा दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेला शब्द आहे. एक हरत आणि दुसरं आलिका. यामध्ये हरत चा अर्थ होतो अपहरण आणि आलिका चा अर्थ होतो मैत्रीण. हे दोन शब्द एकत्र येऊन हरतालिका हा शब्द तयार झाला आहे.




आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात



भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरतालिका तृतीया हा सण साजरा केला जातो. हरतालिका तृतीयेला देवी पार्वती, भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा केली जाते. या दिवशी महिला निर्जळी उपवास करतात. हे व्रत करवा चौथ आणि छठ पूजे इतकचं कठीण आहे. काही महिला हरतालिकेच्या दिवशी अन्नासोबत पाण्याचे सेवन करत नाहीत. मात्र निर्जळ व्रत केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. अशात स्त्रियांनी पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी हरतालिका तीजच्या मुहूर्तावर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ज्यामुळे त्यांना सणाच्या काळात आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू नये.




दही किंवा नारळ पाणी पिऊन उपवास करा



उपवास करण्याआधी दही खावे किंवा नारळ पाणी प्यावे. शरीरातील पाण्याची कमतरता नारळ पाणी पूर्ण करते आणि दही खाल्ल्याने जास्त तहान लागत नाही. पाण्याशिवाय उपवास करण्यापूर्वी दही किंवा नारळपाणीच सेवन केल्याने उपवासात तहान कमी होते.




सूर्यप्रकाश टाळा



दमट उष्णतेमुळे आणि सूर्यप्रकाशामुळे शरीराचे डिहायड्रेशन होऊ लागते आणि खूप तहान लागते. उपवास करताना तुम्ही तुमची तहान नियंत्रणात ठेवता, पण शरीराला पाण्याची गरज जास्तीत-जास्त भासते, ती पूर्ण न केल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, पित्त होणे, मळमळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.अशा समस्या टाळण्यासाठी सूर्यप्रकाश आणि उष्णता टाळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जास्त तहान लागणार नाही आणि तुमच्या शरीराला घाम कमी येतो आणि पाण्याची गरज कमी जाणवते.





शारीरिक हालचाली कमी करा


उपवासादरम्यान शारीरिक हालचालींमुळे थकवा जाणवतो. शरीरातील थकवा कमी करण्यासाठी शरीर पाणी मागते. जर तुम्ही उपवासात पाणी पिऊ शकत नसाल तर शारीरिक हालचाली कमी करा. खूप कष्टाचे किंवा थकवणारे काम करू नका. विश्रांती घ्या जेणेकरुन तुमचे शरीर उत्साही राहील आणि तुम्हाला कमी तहान लागेल.




आंघोळ करा


उपवास करताना तहान लागली असेल, गरम आणि थकवा जाणवत असेल तर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. आंघोळ केल्याने शरीराला थंडावा लागतो आणि तहान कमी लागते.




भगवान शंकरासाठी देवी पार्वतीने केलं होतं व्रत



हरतालिकेची एक पौराणिक कथा आहे. यानुसार, पार्वतीच्या मैत्रिणी तिचं अपहरण करून तिला जंगलात घेऊन गेल्या होत्या. पार्वतीच्या इच्छेव्यतिरिक्त भगवान विष्णु यांनी तिच्याशी विवाह करू नये म्हणून तिच्या मैत्रिणी तिला जंगलात घेऊन जातात. तिथे देवी पार्वतीने भगवान शंकराची आराधना केली आणि भाद्रपद शुल्क तृतीयेच्या दिवशी मातीचं शिवलिंग तयार करून त्याची पुजा केली. पार्वतीच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने देवी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.





Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर