PAK vs BAN: कृष्ण भक्त बांग्लादेशी क्रिकेटरने पाकिस्तानत रचला इतिहास, १४७ वर्षांत पहिल्यांदा घडले असे...

मुंबई: बांग्लादेश क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानात धुमाकूळ घालत आहे. संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज लिटन दासने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले आणि असा रेकॉर्ड केला की जो क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात कधीच झाला नव्हता.


खरंतर, बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना जिंकून बांगलादेशने आधीच १-० अशी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही पाकिस्तानला चांगलीच टक्कर मिळत आहे.


सामन्यात टॉस हरल्यानंतर फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघाने २७४ धावा केल्या होत्या. यानंतर बांग्लादेश संघाची सुरूवात खूप खराब झाली. पाहुण्या संघाने २६ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. मुश्फिकुर रहीम(३), शाकिब अल हसन(२), झाकीर हसन(१), कर्णधार नजमुल हुसैन शांतो(४), मोमिनुल हक(१) आणि शादमान इस्लाम(१०) पूर्ण फ्लॉप झाले.



कृष्ण भक्त लिटन दासचा धमाका


यानंतर बांगलादेशी हिंदू क्रिकेटर लिटन दास ७व्या स्थानावर आला आणि दमदार खेळी केली. त्याने मेहदी हसन मिराजसोबत मिळून १६५ धावांची भागीदारी केली आणि संघाला सांभाळले. स्वत:ला श्रीकृष्णाचा दास सांगणाऱ्या लिटनने सामन्यात २२८ बॉलमध्ये १३८ धावांची खेळी केली.



१४७ वर्षांच्या इतिहासात घडले पहिल्यांदा


लिटन दासने या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला आहे. तो पहिला फलंदाज ठरला आहे ज्याने संघाची धावसंख्या ५० पेक्षा कमी असतानाही बॅटिंगमध्ये टॉप ५मध्ये येऊन ३ वेळा शतक ठोकले आहेत. १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात त्याच्याशिवाय कोणालाच हे जमलेले नाही.


फार कमी चाहत्यांना माहीत असेल की लिटन दास कृष्ण भक्त आहे. तो स्वत:ला कृष्णाचा सेवक म्हणतो. हेच त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायकोमध्येही लिहिले आहे.
Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या