मुंबईची जीवनदायिनी असलेली मुंबई उपनगरीय लोकल सेवा देशाला सर्वाधिक कर प्राप्त करून देते. मुंबईच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे कमी खर्चात, कमी वेळेत ने आण करण्याचे काम लोकल करत असतात. त्यामुळे मुंबईतले अधिक प्रवासी लोकलने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईकरांना देखील हाच प्रवास सोईस्कर आणि अंगवळणी पडला आहे. सद्या असे लक्षात येते की, मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल सेवेचा श्वास गुदमरत चालला आहे. कारण लोकल ट्रेनला मुसळधार पावसाचा तडाखा, ओव्हरहेड वायर तुटने, रुळावरून डब्बे घसरणे, रुळाला तडे जाणे, सिग्नल यंत्रणा बिघडणे , सूचना दर्शक फलक यामुळे प्रवाशांना होणारा त्रास वाढतच चालला आहे.
मी रोजच भाडूप ते बांद्रा असा प्रवास करते, माझा अनुभव सांगायचा तर, भांडुप हे मुंबईचे उपनगर आहे. भांडुप हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. भांडूपला कोकणी माणसे राहत असल्याने कोकणी माणसाची वस्ती मानली जाते. भांडूप स्टेशन विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. भांडुप स्टेशनवर सायंकाळी बसलेल्या फेरीवाल्यांची स्टेशनच्या बाहेर, स्टेशनवरती वर्दळीमुळे अनेकदा प्लॅटफॉर्म, ट्रेनमध्ये गर्दी असल्याने प्रवाशांचा चढताना, उतरताना गोंधळ उडतो. त्यामुळे चेंगराचेंगरीत अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे फेरीवाल्यांची वर्दळ कमी करण्यात यावी. महत्वाची बाब म्हणजे या स्टेशनवर अनेकदा सूचनादर्शक फलक लावले दिसत जात नाहीत.
त्यामुळे अनेक प्रवाशांची, नोकरदारांची तारांबळ उडते. त्यात वयस्कर, अपंग माणसे असले तर त्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागते. काहीवेळा गेलेल्या गाड्यांचे फलक हे उशिरा दाखविले जातात. उदा. द्यायचे झाले तर २:१ ची कुर्ला स्टेशनला थांबा असलेल्या ट्रेनचा फलक काही वेळा ट्रेन गेल्यावर देखीलतसाच असतो. त्यामुळे मागच्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशांची गर्दी होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांपर्यंत ट्रेनची माहिती वेळेत पोहोचविणे आवश्यक आहे. तसेच पावसाळ्यात भांडूप रेल्वे प्लॅटफॉर्मवरती पाण्याची गळती होत असते. प्लॅटफॉर्म क्र. १ वर पावसाचे पाणी तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा वेळेत करण्यात यावा. त्यामुळे प्रवासी भिजणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
भांडूप स्टेशनच्या बाहेर दुकानदार दिवसभराचा भाजीपाल्याचा कचरा सार्वजनिक मुतारीजवळ टाकत असल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे काही प्रवासी स्टेशनच्या सार्वजनिक शोचालयांचा वापर करत असतात. स्टेशनवर असणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचे देखील काहींचे दरवाजे नाहीत, पान, गुटखा खाऊन थुंकणे, कचरा टाकणे यामुळे तिथेही ट्रेनमधून ये-जा करताना येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवासी वैतागले आहेत. भांडूप रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस चौकीच्या बाजूला ६०६ बसचा थांबा देण्यात आला आहे. तिथे घरी जाण्यासाठी प्रवासी रांग लावतात.
त्या फुटपाथवर गटाराचे झाकण कधी बंद तर कधी उघडे असते. याची अजूनही दखल घेण्यात आलेली नाही. पोलीस चौकीच्या आजूबाजूला खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने अनेकवेळा गाड्यांमुळे खड्यांमध्ये साचलेले पाणी प्रवाशांच्या कपड्यांवर पडते, त्या पाण्यातून चालताना नागरिकांना खूपच कसरत करावी लागते. त्यामुळे पाऊस पडण्याच्या अगोदर खड्डे बुजविण्यात यावेत. भांडूप स्टेशनच्या बाहेर असलेल्या फ्लायओव्हरचा कमीतकमी वापर केला जातो. त्यामुळे फ्लायओव्हरची जागा गर्दुले आपल्याला राहण्यासाठी करतात. तसेच भांडूप स्टेशन परिसरातील सरकत्या जिन्याच्या बाजूला घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. भांडूप पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील ब्रिजवर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. त्याठिकाणाहून भांडूप नागरिकांची ये- जा असते त्यामुळे त्या ठिकाणी दिव्यांची सोय करणे गरजेचे आहे.
भांडूप प्लॅटफॉर्म क्र. २ वर स्वयंचलित जिना बसविणे आवश्यक आहेत. भांडूप ईश्र्वरनगर गेटला तिकीट खिडकी करणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाने लोकल सेवा सुखकर करण्यासाठी वातानुकुलित गाड्यांची सोय केली होती, परंतु वातानुकुलीत गाड्यांमुळे बाकीच्या गाड्यांचा खोळंबा होत असतो. तसेच वातानुकुलीत गाड्या रात्रीच्या रिकाम्याच जात असल्याने वातानुकुलीत गाड्यांची वेळ रात्री उशिरापर्यंत न ठेवता रात्री १० वाजेपर्यंत ठेवण्यात यावी. महिला वर्गाचे दोन डब्बे वाढवून देखील रोजगारासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे महिलांचे डब्बे वाढविण्यात यावेत. अनेकवेळा मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉकच्या वेळी किंवा नोकरदारांच्या कामाच्या वेळात (सकाळी, संध्याकाळी) भांडूप स्टेशनला फास्ट लोकल वाढविण्यात येऊन थांबा देणे भांडूपवासियांसाठी लाभदायक ठरेल.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…