Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचे टीम इंडियात होणार पुनरागमन?

  110

मुंबई: अजिंक्य रहाणे बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र त्याने शतक ठोकत पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ चमध्ये लेस्टेशरसाठी शतक ठोकले. रहाणेने १९२ चेंडूंचा सामना करताना १०२ धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर लेस्टेशर संघाला ३०० धावांचा जवळ पोहोचता आले.


रहाणेने भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेच्या आधी शतक ठोकले. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमनच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत.


खरंतर, काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लेस्टेशर आणि ग्लेमॉर्गन यांच्यात कार्डिफमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान लेस्टेशरच्या दुसऱ्या खेळीदरम्यान रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. त्याने १९२ चेंडूत १०२ धावा केल्या. रहाणेने या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो या शतकानंतर ट्रेंड करू लागला. रहाणेबाबत अनेक पोस्ट एक्सवर करण्यात आले.


रहाणेने जुलै २०२३मध्ये शेवटची कसोटी टीम इंडियासाठी खेळली होती. या सामन्यानंतर तो टीम इंडियात अद्याप परतलेला नाही. आता भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याचे टीम इंडियामधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ८५ कसोटी सामन्यात ५०७७ धावा केल्या. या दरम्यान १२ शतके आणि २६ अर्धशतके ठोकलीत.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार