Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचे टीम इंडियात होणार पुनरागमन?

Share

मुंबई: अजिंक्य रहाणे बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र त्याने शतक ठोकत पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ चमध्ये लेस्टेशरसाठी शतक ठोकले. रहाणेने १९२ चेंडूंचा सामना करताना १०२ धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर लेस्टेशर संघाला ३०० धावांचा जवळ पोहोचता आले.

रहाणेने भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेच्या आधी शतक ठोकले. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमनच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत.

खरंतर, काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लेस्टेशर आणि ग्लेमॉर्गन यांच्यात कार्डिफमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान लेस्टेशरच्या दुसऱ्या खेळीदरम्यान रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. त्याने १९२ चेंडूत १०२ धावा केल्या. रहाणेने या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो या शतकानंतर ट्रेंड करू लागला. रहाणेबाबत अनेक पोस्ट एक्सवर करण्यात आले.

रहाणेने जुलै २०२३मध्ये शेवटची कसोटी टीम इंडियासाठी खेळली होती. या सामन्यानंतर तो टीम इंडियात अद्याप परतलेला नाही. आता भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याचे टीम इंडियामधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ८५ कसोटी सामन्यात ५०७७ धावा केल्या. या दरम्यान १२ शतके आणि २६ अर्धशतके ठोकलीत.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago