Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचे टीम इंडियात होणार पुनरागमन?

  115

मुंबई: अजिंक्य रहाणे बऱ्याच वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र त्याने शतक ठोकत पुन्हा एकदा भारतीय संघाचा दरवाजा ठोठावला आहे. रहाणेने काऊंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू २०२४ चमध्ये लेस्टेशरसाठी शतक ठोकले. रहाणेने १९२ चेंडूंचा सामना करताना १०२ धावा केल्या. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर लेस्टेशर संघाला ३०० धावांचा जवळ पोहोचता आले.


रहाणेने भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेच्या आधी शतक ठोकले. त्याने टीम इंडियामध्ये पुनरागमनच्या आशा पुन्हा बळावल्या आहेत.


खरंतर, काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लेस्टेशर आणि ग्लेमॉर्गन यांच्यात कार्डिफमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान लेस्टेशरच्या दुसऱ्या खेळीदरम्यान रहाणे चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी आला. त्याने १९२ चेंडूत १०२ धावा केल्या. रहाणेने या खेळीत १३ चौकार आणि १ षटकार ठोकला. तो या शतकानंतर ट्रेंड करू लागला. रहाणेबाबत अनेक पोस्ट एक्सवर करण्यात आले.


रहाणेने जुलै २०२३मध्ये शेवटची कसोटी टीम इंडियासाठी खेळली होती. या सामन्यानंतर तो टीम इंडियात अद्याप परतलेला नाही. आता भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी रहाणेला संधी दिली जाऊ शकते. त्याचे टीम इंडियामधील कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने ८५ कसोटी सामन्यात ५०७७ धावा केल्या. या दरम्यान १२ शतके आणि २६ अर्धशतके ठोकलीत.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र