Mumbai Railway Projects : 'मुंबईकरांचा प्रवास सुखद', मुंबईच्या १२ रेल्वे प्रकल्पांची घोषणा

  153

मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी बातमी दिली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आता मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढवणार आहेत. मुंबईकरांचा वेळ आता खूप वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या १२ रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण १६ हजार २४० कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.



कोणते आहेत हे १२ प्रकल्प ?


१. सीएसटीएम ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
२. मुंबई सेंट्रल ते बोरीवली अशी सहावी रेल्वे लाईन होणार आहे. हा प्रकल्प ३० किलोमीटरचा आहे.
३. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.
४. बोरवली ते विरार अशी पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
५. विरार ते डाहून रोड अशी तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ६४ किलोमीटरचा आहे.
६. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
७. ऐरोली-कळवा हा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
८. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. हा प्रकल्प ३२ किलोमीटरचा आहे.
९. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. हा प्रकल्प १४ किलोमीटरचा आहे.
१०. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होणार आहे.
११. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येणार आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वेसाठी होणार आहे.
१२. निळजे ते कोपर दरम्यानच्या ५ किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.


https://x.com/AshwiniVaishnaw/status/1829572663523590257
Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत