Mumbai Railway Projects : 'मुंबईकरांचा प्रवास सुखद', मुंबईच्या १२ रेल्वे प्रकल्पांची घोषणा

मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी बातमी दिली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आता मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढवणार आहेत. मुंबईकरांचा वेळ आता खूप वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या १२ रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण १६ हजार २४० कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.



कोणते आहेत हे १२ प्रकल्प ?


१. सीएसटीएम ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
२. मुंबई सेंट्रल ते बोरीवली अशी सहावी रेल्वे लाईन होणार आहे. हा प्रकल्प ३० किलोमीटरचा आहे.
३. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.
४. बोरवली ते विरार अशी पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
५. विरार ते डाहून रोड अशी तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ६४ किलोमीटरचा आहे.
६. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
७. ऐरोली-कळवा हा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
८. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. हा प्रकल्प ३२ किलोमीटरचा आहे.
९. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. हा प्रकल्प १४ किलोमीटरचा आहे.
१०. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होणार आहे.
११. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येणार आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वेसाठी होणार आहे.
१२. निळजे ते कोपर दरम्यानच्या ५ किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.


https://x.com/AshwiniVaishnaw/status/1829572663523590257
Comments
Add Comment

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल

महाराष्ट्रात गॅस, पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही 

 इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष समित्यांची स्थापना; रिफायनरींकडून उत्पादन वाढवले मुंबई : इराण

महाराष्ट्रात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांची काळजी घ्यावी; पाऊस आणि वाऱ्यापासून पिकांना सुरक्षित ठेवावे मुंबई :