Mumbai Railway Projects : ‘मुंबईकरांचा प्रवास सुखद’, मुंबईच्या १२ रेल्वे प्रकल्पांची घोषणा

Share

मुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक मोठी बातमी दिली आहे. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. आता मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढवणार आहेत. मुंबईकरांचा वेळ आता खूप वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या १२ रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण १६ हजार २४० कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

कोणते आहेत हे १२ प्रकल्प ?

१. सीएसटीएम ते कुर्ला अशी पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
२. मुंबई सेंट्रल ते बोरीवली अशी सहावी रेल्वे लाईन होणार आहे. हा प्रकल्प ३० किलोमीटरचा आहे.
३. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे.
४. बोरवली ते विरार अशी पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
५. विरार ते डाहून रोड अशी तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. हा प्रकल्प ६४ किलोमीटरचा आहे.
६. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
७. ऐरोली-कळवा हा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
८. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग तयार होणार आहे. हा प्रकल्प ३२ किलोमीटरचा आहे.
९. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. हा प्रकल्प १४ किलोमीटरचा आहे.
१०. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होणार आहे.
११. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येणार आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वेसाठी होणार आहे.
१२. निळजे ते कोपर दरम्यानच्या ५ किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे १५ ते २० मिनिटांनी कमी होईल.

https://x.com/AshwiniVaishnaw/status/1829572663523590257

Recent Posts

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

12 minutes ago

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

3 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago