चीनमध्ये रंगणार भारत-पाक हॉकीचा थरार

हरमनप्रीत सिंह करणार नेतृत्व


नवी दिल्ली : भारतीय हॉकी टीम पॅरिस ऑलिम्पिक-२०२४ मध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सहभागी होणार आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या हॉकीच्या १८ सदस्यीय संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत सिंह करणार आहे.


आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये होणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंह करणार आहे. तर उपकर्णधार विवेक सागर प्रसाद करणार आहे. ही स्पर्धा ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार आहे. तर या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताच्या हॉकी संघाचे वेळापत्रक


८ सप्टेंबर - चीन
९ सप्टेंबर - जपान
११ सप्टेंबर - मलेशिया
१२ सप्टेंबर - कोरिया
१४ सप्टेंबर - पाकिस्तान
१६ सप्टेंबर - सेमी फायनल
१७ सप्टेंबर - फायनल

भारतीय संघ


गोलकीपर - कृशन बहादूर , सूरजा करकेरा


डिफेंडर - जरनप्रीत सिंह, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंह (कर्णधार),जुगराज सिंह, संजय आणि सुमीत


मिडफील्डर - राजकुमार पाल, नीलाकांता शर्मा, विवेक सागर प्रसाद (उप कर्णधार), मनप्रीत सिंह आणि मोहम्मद राहिल


फॉरवर्ड - अभिषेक सुखजीत सिंह, अराइजीत सिंह हुंडल, उत्तम सिंह (ज्यूनिअर संघाचा कर्णधार) आणि गुरजोत सिंह

Comments
Add Comment

Shreyas Iyer Health Update : 'स्टार बॅट्समन' श्रेयस अय्यरकडून मोठी अपडेट! गंभीर दुखापतीनंतर ICU मधून भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिलासा!

मुंबई : टीम इंडियाचा स्टार फलंदाज (Star Batsman) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या एका गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात उपचार घेत आहे.

हरमनप्रीत कौर आणि तो ऐतिहासिक विक्रम: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी 'त्या' १७१ धावांची चर्चा!

नवी दिल्ली : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या