प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे कृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्ताने भक्ती सोहळ्याचे आयोजन

जव्हार(मनोज कामडी - प्रगती प्रतिष्ठान जव्हार येथे रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन केले आहे.
गोविंदा रे गोपाळा!


सनातन हिंदु धर्मात सर्वांचे लाडके दैवत म्हणजे भगवान कृष्ण. भक्त प्रेमाने त्यांना गोविंद,गोपाल,कान्हा अश्या विविध नावांनी जाणतात आणि आपले गाऱ्हाणे हक्काने मांडतात. भगवान कृष्ण भारत भूमीत सर्वत्र आराध्य दैवत आहेत.गुजरात मध्ये द्वारकाधीश ,महाराष्ट्रात विठ्ठल,कर्नाटकात उडुपी कृष्ण,ओरिसा मध्ये जगन्नाथ आणि उत्तर प्रदेशात ठाकुरजी असे सर्वत्र ते परम श्रध्देने भजले जातात.भगवंत अजन्मा आहेत तरीही भक्तांसाठी आपल्या दिव्य धामातून पृथ्वीवर अवतरित होतात. अवघ्या ५००० वर्षापूर्वी भगवंत अवतरले त्यांनी विविध मनमोहक लीला केल्या.


भगवंतांनी केलेल्या अनेक दिव्य काऱ्यांपैकी एक म्हणजे भगवद गीतेचा उपदेश. गीतेमध्ये भगवंत मानवाला समाधान आणि सुखाचे जीवन जगत ,भव सागर कसा ओलांडता येईल यावर विस्तारित बोलले,गीतेमध्ये चौथ्या अध्यायात भगवंत सांगतात,जन्म कर्म च मे दिव्यम
एवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म
नैति मामेति सोऽर्जुन ॥
हे अर्जुना, ज्याला माझ्या स्वरूपाचे आणि क्रियांचे दिव्य स्वरूप माहीत आहे, तो देह सोडल्यानंतर पुन्हा या भौतिक जगात जन्म घेत नाही, तर तो माझ्या शाश्वत धमाची प्राप्ती करतो. केवळ एखाद्याने भगवंताच्या जन्म आणि दिव्य कार्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरीही तो भव बंधनातून मुक्त होतो. सर्वांना भगवंताना शास्त्र शुध्द पद्धतीने आणि प्रामाणिक परंपरेतून जाणण्याची, त्यांची भक्ती करण्याची संधी आणि मार्गदर्शन मिळावे. यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे जगभर प्रचार ,प्रसाराचे कार्य केले जाते. याचाच भाग म्हणून जव्हार शहरात गेल्या ५ वर्षापासून सत्संग दर गुरुवारी प्रगती प्रतिष्ठान येथे घेतला जातो. या सत्संगातून भाविकांना फार चांगले अनुभव आलेले आहेत. बऱ्याच जणांना व्यसन सोडणे , स्वभाव बदलणे,सुखी कौटुंबिक जीवन जगायला प्रेरणा मिळाली आहे.


आपल्या लाडक्या कृष्णाच्या भक्तीने कृतज्ञ होऊन जव्हार भक्तगण आनंदाने जन्माष्टमी साजरी करतात. हे मोठ्या जन्माष्टमी उत्सवाचे ३ रे वर्ष असून सर्वत्र आनंद,उत्साहाचे वातावरण आहे आणि भाविक या कार्यक्रमासाठी उत्सुक असून
या सोहळ्यात श्री विग्रहांचा अभिषेक,हरिकथा,कीर्तन, सांस्कृतीक कार्यक्रम आणि सर्व भाविकांसाठी जेवण प्रसाद लाभ घेण्यासाठी सर्वांनी या जन्माष्टमी उत्सवात सहभागी होऊन आनंद लुटण्यासाठी जव्हार भक्तांकडून आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली

Crime News: धक्कादायक! लग्नात अडथळा ठरत असल्याने प्रेयसीची निर्घृण हत्या; शिक्षकासह वडील आणि मामा अटकेत

दोडामार्ग: प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या नात्याचा शेवट एका धक्कादायक हत्याकांडात (Murder) झाला आहे. कर्नाटकातील

Maharashtra Monsoon Weather Alert : महाराष्ट्रात निसर्गाचा लहरी खेळ! कुठे मुसळधार पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मान्सून कधी येणार?

केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर

Bhimashankar Temple : भाविकांसाठी आनंदाची बातमी! 5 महिन्यांनंतर भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था

पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर (Bhimashankar Temple) हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र तब्बल पाच ते सहा

Wari 2026: लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

मुंबई दि. १३ जून : पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना