Mumbai Crime : शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला अत्याचार, मग...

प्रकार समोर येताच नराधमाला ठोकल्या बेड्या!


भिवंडी : सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बदलापूर घटने नंतर प्रकर्षाने समोर येत असताना भिवंडी शहरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. भिवंडीमध्ये न्यू आझाद नगर येथे राहणाऱ्या शेजाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अत्याचाराचे थरारक कृत्य केले. दरम्यान हा प्रकार समोर येताच अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख (२८) हा नराधम भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहतो. या आरोपीने शेजारील एका १३ वर्षीय मुलीसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तसेच तिच्या घरी कोणी नसताना तिच्यावर सहा महिन्यात वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पीडीत मुलीने आईकडे याबाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात तक्रार दाखल केली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात काल हजर केले असता त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.


Comments
Add Comment

पहिल्या महापालिका सभेत मुख्यमंत्र्यांच्या समक्ष भाजप नगरसेवकांचे घडले असे दर्शन

मुंबई :  मुंबई महापालिकेत मागील पाच वर्ष केवळ पहारेकरी म्हणून काम करणाऱ्या भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची

जे जे उड्डाणपूलाखाली परिसरातील वर्षानुवर्षांच्या कचऱ्यांसह अतिक्रमणांची जळमटेही केली दूर

मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात

मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे

रेस्टॉरंट्सकडून 'सर्व्हिस चार्ज' आकारणी; मुंबई ग्राहक पंचायतीची कारवाईची मागणी

मुंबई  : 'सर्व्हिस चार्ज देणे हे सक्तीचे नसून तो देणे हा ग्राहकांच्या पूर्णपणे स्वेच्छेवर अवलंबून असताना

विजय मल्ल्या भारतात परतणारच नसतील, तर आम्ही याचिका का ऐकावी?

मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल मुंबई  : फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याने आधी भारतात परत यावे. आम्ही तातडीने

मुंबईतील नौदल गोदीमध्ये लागलेली आग नियंत्रणात, जीवितहानी नाही

मुंबई: दक्षिण मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये गुरुवारी रात्री आग लागली, ज्यामुळे परिसरात काही काळासाठी वाहतूक