Mumbai Crime : शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला अत्याचार, मग...

प्रकार समोर येताच नराधमाला ठोकल्या बेड्या!


भिवंडी : सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बदलापूर घटने नंतर प्रकर्षाने समोर येत असताना भिवंडी शहरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. भिवंडीमध्ये न्यू आझाद नगर येथे राहणाऱ्या शेजाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अत्याचाराचे थरारक कृत्य केले. दरम्यान हा प्रकार समोर येताच अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख (२८) हा नराधम भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहतो. या आरोपीने शेजारील एका १३ वर्षीय मुलीसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तसेच तिच्या घरी कोणी नसताना तिच्यावर सहा महिन्यात वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पीडीत मुलीने आईकडे याबाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात तक्रार दाखल केली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात काल हजर केले असता त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.


Comments
Add Comment

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,

सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवे सहकार धोरण; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : सहकार क्षेत्र हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल - मुख्यमंत्री

मुंबई : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन