Mumbai Crime : शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा केला अत्याचार, मग...

प्रकार समोर येताच नराधमाला ठोकल्या बेड्या!


भिवंडी : सध्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना बदलापूर घटने नंतर प्रकर्षाने समोर येत असताना भिवंडी शहरातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. भिवंडीमध्ये न्यू आझाद नगर येथे राहणाऱ्या शेजाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करण्याच्या बहाण्याने अत्याचाराचे थरारक कृत्य केले. दरम्यान हा प्रकार समोर येताच अत्याचार केल्याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, रफिक शेख (२८) हा नराधम भिवंडी शहरातील न्यू आझाद नगर भागातील एका चाळीत राहतो. या आरोपीने शेजारील एका १३ वर्षीय मुलीसोबत मैत्री करण्याच्या प्रयत्नाने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तसेच तिच्या घरी कोणी नसताना तिच्यावर सहा महिन्यात वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले. दरम्यान २५ ऑगस्ट रोजी अल्पवयीन पीडित मुलीने नकार दिल्यानंतर नराधमाने तिला मारहाण केली. यामुळे भयभीत पीडीत मुलीने आईकडे याबाबत सांगितल्यानंतर पालकांनी मुलीसह शांतीनगर पोलीस ठाण्यात नराधमा विरोधात तक्रार दाखल केली.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने नराधम रफिक शेख यास ताब्यात घेत त्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. आरोपीला भिवंडी न्यायालयात काल हजर केले असता त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.


Comments
Add Comment

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

माहिम किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करणार : अ‍ॅड आशिष शेलार

मुंबई : माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात

BMC : गुडन्यूज मुंबईकरांनो! मुंबई मनपाची ‘म्हाडा स्टाईल’ योजना, ४२६ घरं कमी दरात मिळवण्याची सुवर्णसंधी!

मुंबई : मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) आता

सायबर हल्ल्याच्या भीतीने मुंबई महापालिका अलर्ट मोडवर, विभागांना केल्या अशा सूचना

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे कामकाज संगणक प्रणालीद्वारेच केले जात असल्याने या अद्ययावत तंत्रज्ञान आणि

इमारतीवरून वीट कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) : जोगेश्वरी पूर्वेत मजासवाडी परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास कामासाठी जात असलेल्या २२ वर्षीय