Dahi Handi : मुंबईत दहीहंडीचा थरार! २०० हून अधिक गोविंदा जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

  111

मुंबई : काल देशभरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी दहीहंडीचे (Mumbai Dahi Handi) आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक भागांत स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत २४५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांच्यामध्ये बालगोविंदाचांही समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गोविंदांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयात ५२, नायर रुग्णालयात १२, सायन रुग्णालयात २०, सेंट जॉर्ज रुग्णालयात ८, जी.टी. हॉस्पिटलमध्ये ६, पोद्दार रुग्णालयात २८, राजावाडी रुग्णालयात १३, कुर्ला भाभा रुग्णालयात ५ आणि इतर अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींच्या स्थितीवर विशेष लक्ष दिले जात आहे.


दरम्यान, ठाण्यातही १९ गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाने या परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आनंदात अशी अपघातांची मालिका यंदा पुन्हा घडल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.


तर उत्सवातील जखमींवर वेळीच उपचार केल्यामुळे बरेच जण घरी परतले असले तरी काहींची प्रकृती गंभीर राहिल्यामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन गोविंदांची प्रकृती गंभीर


मुंबईतील गोविंदांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कुणाल पाटील (२०) या तरुणाला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तर मनू खारवी (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे. सध्या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

अंगारकी संकष्टीला सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, गणेश भक्तांना मिळणार लाभ

मुंबई (प्रतिनिधी): अंगारकी संकष्टी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येत असल्याने सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी १२

कपिल शर्माच्या कॅनडा येथील कॅफेवर जोरदार फायरिंग, Video पोस्ट करत गँगस्टरने घेतली जबाबदारी

मुंबई: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडा येथील सरे शहरातील कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार केल्याची घटना समोर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत उच्चस्तरीय बैठक

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री

इतिहासाचे विकृतीकरण खपवून घेतले जाणार नाही – आशिष शेलार

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाचे पुनर्परीक्षण करावे -राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती मुंबई : ‘इतिहासाचे

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार मदतीच्या निधीस मान्यता

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यास राज्य शासन प्राधान्य देत आहे. राज्यात

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबईत शासकीय कार्यालयांना सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन