Dahi Handi : मुंबईत दहीहंडीचा थरार! २०० हून अधिक गोविंदा जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई : काल देशभरात मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मुंबईत दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणी दहीहंडीचे (Mumbai Dahi Handi) आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक भागांत स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. एकीकडे दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत २४५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यांच्यामध्ये बालगोविंदाचांही समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये गोविंदांच्या उपचारासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयात ५२, नायर रुग्णालयात १२, सायन रुग्णालयात २०, सेंट जॉर्ज रुग्णालयात ८, जी.टी. हॉस्पिटलमध्ये ६, पोद्दार रुग्णालयात २८, राजावाडी रुग्णालयात १३, कुर्ला भाभा रुग्णालयात ५ आणि इतर अनेक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींच्या स्थितीवर विशेष लक्ष दिले जात आहे.


दरम्यान, ठाण्यातही १९ गोविंदा जखमी झाले आहेत, त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाने या परिस्थितीत त्वरित वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. दहीहंडी उत्सवाच्या आनंदात अशी अपघातांची मालिका यंदा पुन्हा घडल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.


तर उत्सवातील जखमींवर वेळीच उपचार केल्यामुळे बरेच जण घरी परतले असले तरी काहींची प्रकृती गंभीर राहिल्यामुळे काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन गोविंदांची प्रकृती गंभीर


मुंबईतील गोविंदांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. कुणाल पाटील (२०) या तरुणाला पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तर मनू खारवी (२५) याच्या डोक्याला मार लागला आहे. सध्या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment

दहिसर मेट्रो आणि पॉड टॅक्सीच्या उदघाटनाची तारीख ढकलली, काय आहे कारण ?

मुंबई : मुंबईच्या लोकलवरचा भार कमी व्हावा आणि नागरिकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी

शाळांना 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल' नाव वापरण्यास मज्जाव!

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पालकांची दिशाभूल थांबवण्यासाठी निर्बंध मुंबई : आपल्या पाल्याला 'आंतरराष्ट्रीय'

मुंबईतील प्रलंबित एलआयसी इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार, शेकडो कुटुंबांना दिलासा

कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांची

शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतून नव्या पिढीला ऊर्जा व दिशा मिळेल - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील विधानभवन

'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया'

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई : भारतरत्न

कोरोनावर लस तयार करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एका पेंटिंगमुळे चर्चेत

मुंबई : शहरात पार पडलेल्या एका भव्य कला लिलावाने कला विश्वासह उद्योग क्षेत्रातही मोठी चर्चा रंगवली आहे. एका