MahaVikas Aghadi: मविआचा तिढा सुटेना; काँग्रेस-ठाकरे गटात जागांवरुन मतभेद

ठाकरे गटाचा २० ते २२ जागांसाठी आग्रह, शरद पवार गट ७ जागांसाठी उत्सुक


मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींनी वेग घेतला आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीमधील प्रत्येक पक्षाला सर्वात जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीचं मुंबईमतील जागावाटपाचं भिजत घोंगडं कायम राहिलेलं आहे. काही जागांवर दोन पक्ष तर काही जागांवर तीनही पक्षांचा दावा कायम आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या जागावाटपासाठी बैठकादेखील सुरु झाल्या असून काही दिवासांपूर्वी महाविकास आघाडीची नुकतीच मुंबईतील जागांच्या वाटपासाठी बैठक पार पडलेली. त्यामुळे माविआच्या पूढच्या बैठकीतही मुंबईतल्या जागांसंदर्भात चर्चा जोरदार होत राहणार आहे २० ते २२ जागांवर शिवसेना ठाकरे गट अजूनही आग्रही आहे. अशातच त्यामधल्या काही जागांवर काँग्रेसही आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मुंबईमधल्या ५ ते ७ जागांवर आपला दावा सांगितलं आहे.


मुंबईत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात (Seat Sharing) बैठक पार पडली. आगामी विधानसभेसाठी या बैठकीत जागा वाटपाच्या रणनितीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. काँग्रेस हायकमांड मुंबईतील वादाती जागांचा निर्णय सोडवणार असल्याचीसुद्धा माहिती आहे. काँग्रेस नेत्यांकडून मविआतील घटक पक्षाकडे भूमिका स्पष्ट झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी जागेबाबतचा हायकमांडचा निर्णय मान्य असेल अशी भूमीका स्पष्ट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस-ठाकरे गटात जागांवरुन मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी बैठकांमध्ये जागावाटपाचा निर्णय होईल असा विश्वास मविआतील नेत्यांना आहे.



शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत हव्यात सात जागा


मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा हव्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सात जागांसाठी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. विशेषतः म्हणजे मुंबईतील कुर्ला, घाटकोपर पूर्व, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर राष्ट्रवादी लढवण्यास इच्छुक असल्याचं समोर आलंय. मुंबईतील विधानसभेच्या जागांचा प्रस्ताव सादर केला आहे.


कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


मुंबईमधील ६ लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. त्यापैकी, राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर मागणी केली आहे. त्यामुळेच, उर्वरीत जागा काँग्रेसआणि ठाकरेंच्या शिवसेनाला सोडल्या जातील. त्यामुळे, नेमकं किती आणि कोणत्या जागा कोणत्या पक्षाला मिळतील, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपात उशीर झालेल्या महायुतीसाठी डोकेदुखी ठरल्याने आता विधानसभेसाठी लवकरात-लवकर जागावाटप करण्याची योजना महायुतीच्या सर्वच पक्षांकडून आखली जात आहे.

Comments
Add Comment

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि

BMC Waste Management : मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती: महानगरपालिकेकडे नोंदणी न करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

मुंबई : घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व व्यक्तींनी

BMC News : एकही मॅनहोल्स उघडे राहता कामा नये

महापालिका आयुक्तांनी दिले संबंधित खात्यांसह सहायक आयुक्तांनाही निर्देश मुंबई : सध्या सुरू असलेली सर्व