Womens T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा!

  146

कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या सविस्तर माहिती


मुंबई : भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संयुक्त अरब अमिराती आणि शाहजाह येथे महिला टी २० विश्वचषक २०२४ (Womens T20 World Cup) साठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली. ३ ते २० ऑक्टोबर दरम्यान या महिला टी-२० चे सामने खेळले जाणार असून हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर मराठमोळ्या स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिची उपकर्णधार पदावर निवड करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सहावेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर (अ) गटात भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे आव्हान असणार आहे. तर (ब) गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश व स्कॉटलंड हे समोरासमोर असतील. प्रत्येक संघ गटात चार सामने खेळवले जातील. या सामन्यांमधून अव्वल स्थानी असणारे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचे सामने आयोजित करण्यात आले असून २० ऑक्टोबर रोजी अंतिम सामना दुबई येथे होणार आहे. त्यापूर्वी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने होणार आहेत.



भारतील क्रिकेट खेळाडूंची नावे


हरमनप्रीत कौर ( कर्णधार), स्मृती मंधाना (उप कर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रीग्ज, रिचा घोष (यष्टिरक्षक), यास्तिका भाटीया (यष्टिरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, दयालन हेमलथा, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, संजना संजीवन.


राखीव खेळाडू – उमा चेत्री, तनुजा कनवर, सैमा ठाकोर

Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे