Kangana Ranaut On Farmers Protest : 'शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन् हत्या...' कंगना रणौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

  47

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि बॉलीवूडची अभिनेत्री कंगना राणौत (Kangna Ranaut) आपल्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. कंगनाने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. दरम्यान, आता कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्कार झाल्याचा आरोप तिने केला आहे. कंगनाची या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

'...तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता'


दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवलं असतं. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. अनेक माणसे आंदोलनादरम्यान मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते. 'सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जे काही होत आहे, ते योग्य नाही,' असं कंगना म्हणाली आहे.


बॉलिवूड बांग्लादेशातील परिस्थितीवर गप्प


बॉलिवूडमधील बांग्लादेशातील परिस्थितीवर कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगनाने म्हणाली की, 'या लोकांना काहीही माहिती नसतं. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात, देशात किंवा जगात काय सुरु आहे, या गोष्टींनी त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरून जातात,' अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे.

कोलकाता बलात्कारावर म्हणाली...


माझ्यासाठी 'महिलांची सुरक्षा' हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते. मी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या शोमधून आयटम नंबरलाही विरोध केला होता. एखाद्या महिलेचं शरीर फक्त मनोरंजनासाठी असतं का?,' असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला.

काँग्रेसवर खडतर टीका


दरम्यान, आता काँग्रेस कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन आक्रमक झाली आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी तर कंगना राणौतवर NSA लागू करण्याची मागणीसुद्धा केली आहे. वेरका म्हणाले, 'कंगना रणौत नेहमी पंजाबच्या नेत्यांबाबत गरळ ओकते. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाने या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवावा,' अशी मागणी वेरका त्यांनीयांनी केली आहे.
Comments
Add Comment

Woman Kirtankar Murder: महिला कीर्तनकारची आश्रमात दगडाने ठेचून हत्या, संभाजीनगर हादरले

संभाजीनगर: वैजापुरातील एका आश्रमात महिला कीर्तनकाराची अज्ञात मारेकऱ्याने दगडाने ठेचून निर्घृण हत्या (Woman Kirtankar Murder)

Asian Paints Acquisition: ब्रेकिंग! एशियन पेंटसने White Leak डेकोर कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण केले

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या रंग उत्पादन कंपनीपैकी एक एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीने लाईटिंग घर सजावट कंपनी (Home Decor)

Donald Trump Trade: भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेला 'Trade Deal ' साठी रवाना ! 'या' मुद्यावर तोडगा निघणार?

प्रतिनिधी: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे आर्थिक शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाले आहे. युएस

Central Bank of India : सेंट्रल बँकेने Future Generali India Insurance कंपनीत २४.९१ शेअर्सचे अधिग्रहण केले! बँक म्हणाली....

प्रतिनिधी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) या राष्ट्रीयकृत बँकेने (PSU) फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी (Future Generali

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

HDB Financial Services IPO GMP: HDB ने रचला नवा इतिहास चार वर्षांतील सर्वाधिक सबस्क्रिप्शन कंपनीने मिळवले 'या' दराने सुरू आहे GMP

प्रतिनिधी: एचडीबी फायनांंशियल सर्विसेस (HDB Financial Services Private Limited) या एनबीएफसी कंपनीच्या आयपीओने नवा इतिहास रचला आहे. या