मुंबई: एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नेहमी काही ना काही प्लान साजर करतात. एअरटेल भारत विविध भागांमध्ये आपतग्रस्त पीडित लोकांसाठी काही खास ऑफर सादर करत असते. खरंतर, एअरटेलने काही पीडित लोकांसाठी १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगचे फायदे फ्रीमध्ये देण्याची घोषणा केली आहे.
एअरटेलची खास ऑफर
भारताच्या पूर्वोत्तर राज्ये म्हणजे मणिपूर, मिझोरम, मेघालय आणि त्रिपुरा मधील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे लोकांचे जनजीवन व्यस्त झाले आहे. अनेक लोकांचे यात बळीही गेले आहेत. या कारणाने एअरटेलने या भागांमध्ये पीडित लोकांना दिलासा देण्यासाठी काही खास ऑफर्स सादर केले आहेत.
एअरटेलने १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगची सुविधा मोफत देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय एअरटेलने पोस्टपेड ग्राहकांसाठी दिलासा देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची शेवटची तारीख ३० दिवसांसाठी पुढे वाढवले आहे. याचा अर्थ आहे की एअरटेलच्या पोस्टपेड युजर्स आपला बिल भरणा ३० अतिरिक्त दिवसांमध्ये करू शकतील.
फ्री डेटा आणि कॉलिंग
एअरटेलच्या या ऑफरच्या कारणामुळे लोक रिचार्जचे टेन्शन न घेता इंटरनेटच्या माध्यमातून जोडले जाऊ शकतात. प्रीपेड ग्राहकांसाठी ही सुविधा ४ दिवसांसाठी उपलब्ध असेल.