२४ वर्षाच्या या खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, Paris Olympicsमध्ये रचला होता इतिहास

  38

मुंबई: भारताची टेबल टेनिस खेळाडू अर्चना कामथने वयाच्या २४व्या वर्षी निवृत्ती घेत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या या खेळाडूने वयाच्या २४व्या वर्षी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या टॉप टेबल टेनिसपटूंपैकी एक अर्चना कामथने हा निर्णय अभ्यासासाठी घेतला आहे. तिला अमेरिकेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे.


अर्चना कामथ पॅरिस ऑलिम्पिकच्या क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचणाऱ्या भारतीय संघाची भाग होती. क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीविरुद्ध भारताला केवळ एक विजय मिळवता आला होता. तो विजय अर्चनाच्या नावावर होता. दरम्यान, ती अभ्यासासाठी आता मिशिगन येथे पोहोचली आहे.


एका मीडियाशी बोलताना तिने सांगितले, मी प्रोफेशनल टेबल टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे कारण अभ्यासाप्रती माझे प्रेम आहे. या निर्णयामागे आर्थिक कारण नाही. मला तर सरकार आणि चाहत्यांकडून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. अर्चना कामथने भारतीय संघाला पॅरिसमध्ये क्वार्टरफायनलपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.


अर्चना टेबल टेनिस सोडण्यामागचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे २०२८मधील लॉस एजंलिसम्ये ऑलिम्पिक जिंकण्याची शक्यता कमी आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर आपले कोच अंशुल गर्ग यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले की ,मी अर्चनाला म्हटले की पुढील ऑलिम्पिक मेडल जिंकणे कठीण आहे. ती अजूनही जगातील टॉप १० मध्ये सामील नाही आहे. खूप मेहनत करावी लागेल आणि गॅरंटीही नाही. मला वाटते अर्चनाने खेळ सोडण्याचा निर्णय आधीच घेतला होता. एकदा तिने निर्णय घेतला तर तो बदलणे कठीण आहे.


अर्चना कामथचा भाऊ नासामध्ये काम करते. अर्चना आपल्या भावाला आदर्श मानते. तिचे म्हणणे आहे की, तो माझा आदर्श आहे आणि मला अभ्यासासाठी तो नेहमी प्रेरित करतो. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे. टेबल टेनिसमधील १५ वर्षे खूप चांगली राहिली. आपल्या देशासाठी खेळण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठा आनंद नाही.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार