Flight Ticket Hike : विमान प्रवास महागला! आता एकदिशा विमान प्रवासासाठी द्यावे लागणार अधिकचे पैसे

नवी दिल्ली : एकीकडे माणसाला दैनंदिन जीवनात गरजेपयोगी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढत चालले असताना आता प्रवासदेखील महाग होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला असून याचा चांगलाच फायदा विमान कंपन्यांनी घेतला आहे. गणेशोत्सव, ओनम, दिवाळी अशा सणांच्या कालावधीत प्रवासासाठी आत्तापासून विमानाच्या तिकीटांचे आरक्षण सुरू झाले आहे. त्यातच आता विमानप्रवासात शुल्कवाढ (Flight Ticket Price Hike) झाल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ऐन सणांच्या काळात नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.


प्रमुख देशांतर्गत मार्गावरील वन-वे तिकीट दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर केरळ शहरांमध्ये काही फ्लाइटचे भाडे २० ते २५ टक्के वाढवण्यात आले आहेत. इक्सिगो या ट्रॅव्हल पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली-चेन्नई मार्गावरील थेट फ्लाइटसाठी इकॉनॉमी क्लासचे सरासरी वन-वे भाडे २५ टक्क्यांनी वाढून ७ हजार ६१८ रुपये झाले आहे. तर मुंबई- हैदराबाद मार्गावरील तिकीट दर २१ टक्क्यांनी वाढून ५ हजार १६२ रुपये झाले आहेत. दिल्ली-गोवा आणि दिल्ली- अहमदाबाद मार्गावरील भाडे १९ टक्क्यांनी वाढून अनुक्रमे ५ हजार ९९९ रुपये आणि ४ हजार ९३० रुपये झाले आहेत.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे