Pimpri Chinchwad news : पिंपरी चिंचवडच्या आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू!

जलपूजनाला गेले आणि पूजा करत असतानाच अचानक...


पुणे : मागच्या काही दिवसांत पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने अनेक धबधब्यांच्या तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटनासाठी बंदी घातली होती. मात्र, आता पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणच्या वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमातील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत (Indrayani river) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जलपूजनासाठी गेले असता हा अनर्थ घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे जवळपास ५०-६० विद्यार्थी आज सकाळी इंद्रायणी नदी पात्रात जलपूजनासाठी गेले होते. यावेळी पूजा करत असताना एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडू लागला, त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी मारली, त्या दरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले आहेत.


याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने जय दायमा (वय १९) या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे तर ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार ह्या दोन विद्यार्थ्यांचा अजूनही युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. आश्रम शाळेच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.



आश्रमशाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


दरम्यान, या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस