Pimpri Chinchwad news : पिंपरी चिंचवडच्या आश्रम शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू!

जलपूजनाला गेले आणि पूजा करत असतानाच अचानक...


पुणे : मागच्या काही दिवसांत पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने अनेक धबधब्यांच्या तसेच तलावांच्या ठिकाणी पर्यटनासाठी बंदी घातली होती. मात्र, आता पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणच्या वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रमातील तीन विद्यार्थ्यांचा इंद्रायणी नदीत (Indrayani river) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे विद्यार्थी जलपूजनासाठी गेले असता हा अनर्थ घडला.


मिळालेल्या माहितीनुसार, वेदश्री व्यास तपोवन गुरुकुल निवासी आश्रम शाळेचे जवळपास ५०-६० विद्यार्थी आज सकाळी इंद्रायणी नदी पात्रात जलपूजनासाठी गेले होते. यावेळी पूजा करत असताना एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रात बुडू लागला, त्या विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी इतर दोन विद्यार्थ्यांनी पाण्यात उडी मारली, त्या दरम्यान ते दोन्ही विद्यार्थी देखील बुडाले आहेत.


याबाबतची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. अग्निशमन दलाने जय दायमा (वय १९) या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला आहे तर ओंकार पाठक आणि प्रणव पोद्दार ह्या दोन विद्यार्थ्यांचा अजूनही युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. आश्रम शाळेच्या हलगर्जीपणामुळे आज तीन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.



आश्रमशाळेच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


दरम्यान, या विद्यार्थ्यांना धोकादायक नदीपात्राजवळ जाण्यासाठी गुरुकुल आश्रमाने कशी काय परवानगी दिली? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या गुरुकुल निवासी आश्रमच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी देखील मागणी होत आहे.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,