नांदगावमध्ये समुद्राला नारळ अर्पण करतांना व मंगळागौर विसर्जन मिरवणुकीत कोळी बांधवांच्या उत्साहाला उधाण

  68

नांदगाव मुरुड(उदय खोत)- श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्याला शांत होण्याचे आवाहन करतांनाच यावर्षीचा मच्छीमारीचा हंगाम चांगला जाऊदे म्हणून आर्त विनवणी करीत मोठ्या भक्तिभावाने नारळ व राखी अर्पण केला.


तसेच नारळी पौर्णिमेच्या दिवशीच कोळीवाड्यात सकाळी पुजन केलेल्यामंगळागौरीच्या विसर्जनाच्या निघालेल्या भव्य मिरवणुकीत मोठ्या हर्षोल्लासात नाचणाऱ्या नांदगाव मधील कोळी बंधू भगिनींच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले होते.


सायंकाळी नांदगावच्या ग्रामस्थांनी गावातून काढलेल्या नारळाच्या मिरवणुकीच्या बरोबरीनेच कोळीवाड्यातील बंधू भगिनींच्या निघालेल्या या मिरवणूकीने कोळीवाडा व आजुबाजूचा परिसर गजबजून गेला होता.सायंकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीत कोळी भगिनींनी आपल्या पारंपरिक वेशभूषा साकारल्या होत्या.


त्यांनी डोक्यावर सजवलेला करा तर काहींच्या मंगळागौर होत्या.बेंजोच्या तालावर अनेक तरुण तरुणींनी ठेका धरला होता.तर मिरवणुकीत सजवलेल्या मोठ्या नारळासह पंच कमिटीच्या गुरुजींच्या हाती पूजन केलेला नारळ होता.मिरवणूक शांततेत पार पडली.
Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला