Rakshabandhan 2024 : यंदाचा रक्षाबंधन असणार खास! एकाच दिवशी जुळून आले ४ शुभयोग

  93

जाणून घ्या योग्य मुहूर्त आणि तिथी


मुंबई : हिंदू धर्मात भाऊ बहिणीचा खास सण म्हणजेच 'रक्षाबंधन' (Rakshabandhan 2024) सणाला फार महत्त्व असते. यंदा हा सण १९ ऑगस्ट रोजी येणार आहे. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधते. तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आरोग्यासाठी आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना करते. तर आपल्या बहिणीची आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन भाऊ या दिवशी बहिणीला देतो. पौराणिक मान्यतेनुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.


दरवर्षीप्रमाणे यंदाचा रक्षाबंधन विशेष मानला जाणार आहे. कारण यावेळी एकाच दिवशी चार शुभयोग जुळून आले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत ते शुभ योग. तसेच रक्षाबंधन साजरा करण्याचा योग्य मुहूर्त आणि तिथी.



पौर्णिमा तिथी केव्हा आणि वेळ काय?


पौर्णिमा तिथी १९ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल.



कोणते आहेत चार शुभ योग?



  • सर्वार्थ सिद्धी योग : सर्वार्थ सिद्धी योग शुभ कार्यासाठी अतिशय लाभदायी मुहूर्त मानला जातो. हा शुभयोग १९ ऑगस्टला सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत असेल.

  • रवियोग : रवियोग हा शुभकार्यासाठी लाभदायक योग मानला जातो.

  • शोभन योग : शोभन योग शुभता आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे.

  • श्रवण नक्षत्र: हे नक्षत्र शुभ कार्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.


योग्य मुहूर्त


हिंदू पंचांगानुसार, यंदा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणार असून, हा मुहूर्त रात्री ९ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. एकूणच हा शुभ मुहूर्त ०७ तास आणि ३७ मिनिटांचा असेल.


(टीप : सदर दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रांच्या आधारे दिली आहे. 'प्रहार' या कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.)

Comments
Add Comment

आर्थिक वर्ष २६ मध्ये भारताचा वास्तविक जीडीपी विकास दर ६.४-६.७% राहणार!

CII अध्यक्ष राजीव मेमानी यांचे वक्तव्य प्रतिनिधी: भारतीय अर्थव्यवस्था ६.४% ते ६.७% वाढणार असे वक्तव्य सीआयआयचे

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

दोन कोटींच्या अमली पदार्थांच्या म्होरक्याला हैदराबाद विमानतळावर अटक

कल्याण : मानपाडा पोलीसांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात सुमारे दोन कोटी करोड रूपयांचे १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी)

डोळ्यांसमोर पाणी असूनही घागर रिकामीच

विजेच्या अघोषित भारनियमनाने बदलापूरकर हैराण बदलापूर : बदलापूर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. चौथी मुंबई

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.