Independence Day 2024: आपण संकल्प केला तर विकसित भारताचे लक्ष्य गाठू शकतो- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: भारताच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला. यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची आठवणही केली. पंतप्रधान मोदी म्हणाले जेव्हा आपण ४० कोटी होतो तेव्हा महासत्तेला हरवले होते. आज तर आपण १४० कोटी आहोत.


संबोधित करण्यासाठी पंतप्रधान मोदींना स्वदेशी १०५ एमएम लाईट फिल्ड गनने २१ तोफांची सलामी देण्यात आली. सोबळ्यात ६००० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.पाहा काय म्हणताहेत पंतप्रधान मोदी



४० कोटी लोकांनी तोडल्या होत्या गुलामीच्या बेड्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझ्या प्रेमळ देशवासियांनो आपण जरा स्वातंत्र्यांचे ते दिवस आठवूया. शेकडो वर्षांची गुलामी, प्रत्येक कालखंड संघर्ष करत आहोत. महिला असो, तरूण असो, आदिवासी असो सगळे गुलामीविरोधात युद्ध लढत आहेत. १८५७चा स्वातंत्र्या संग्रामाचे हिरो अनेक आदिवासी भागातून होते. तेथे स्वातंत्र्याची लढाई लढली जात होते. त्यावेळेस ४० कोटी लोकांनी जे सामर्थ्य दाखवले.


एकच संकल्प घेऊन ते चालत होते, त्यासाठी लढत होते. तेव्हा एकच स्वप्न होते वंदे मातर, देशाचे स्वातंत्र्य. ४० कोटी लोकांनी जगातील महासत्तेला काढून फेकले होते. त्याच पूर्वजांचे रक्त आपल्या शरीरात आहे. आज आपण १४० कोटी लोक आहेत. त्यामुळे आपण जर एक संकल्प केला एक दिशा निर्धारित करून चाललो तर नक्कीच २९४७ पर्यंत विकसित भारत बनू शकतो.



नैसर्गिक आपत्तींमुळे चिंता वाढल्या


गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे चिंता अधिक वाढली आहे. या नैसर्गिक आपत्तींमध्ये अनेकांनी आपली कुटुंबे गमावली. संपत्ती गमावली आहे. आज मी त्या सगळ्यांबद्दल संवेदना व्यक्त करतो.

Comments
Add Comment

Drone-based postal delivery : हिमाचलमध्ये ड्रोनद्वारे टपाल वितरणाची चाचणी यशस्वी

मंडी : हिमाचल प्रदेशात आता ड्रोनने घरोघरी टपाल पोहोचेल. या दिशेने भारतीय टपाल विभागाने मंडी येथे यशस्वी चाचणी

Indian Army Chief : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आता देशाचे नवे ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ अर्थात लष्करप्रमुख असणार आहेत.

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य

ED Raid On TMC MLA Madan Mitra House : टीएमसी आमदार मदन मित्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू