भारताची अर्थव्यवस्था लवकरच प्रथम तीन क्रमाकांत असेल; राष्ट्रपती मुर्मूंनी घेतला देशाच्या प्रगतीचा आढावा

नवी दिल्ली : राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचेही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या ७८ वर्षात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.


यावेळी राष्ट्रपतींनी देशाने केलेल्या प्रगतीचा पट मांडला. २०२१ ते २०२४ या काळात देशाने ८ टक्के आर्थिक वाढ नोंदवली असून भारत सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. भारत जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होणार आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षात असंख्य कुटुंबं गरीबी रेषेतून वर आले असून राहिलेल्यांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरीचंही राष्ट्रपतींनी कौतुक केले.


महिला आणि युवांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारने महत्व दिले असून त्यासाठी गेल्या दशकभरात अर्थसंकल्पामध्ये निधीत तीनपट वाढ करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. सामाजिक न्याय ही सरकारीच प्राथमिकता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समुदायांसाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. आपल्या वैविध्यासह एकत्र येण्याचं आवाहन करत राष्ट्रपती म्हणाल्या. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या