भारताची अर्थव्यवस्था लवकरच प्रथम तीन क्रमाकांत असेल; राष्ट्रपती मुर्मूंनी घेतला देशाच्या प्रगतीचा आढावा

Share

नवी दिल्ली : राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यासंदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचेही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या ७८ वर्षात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.

यावेळी राष्ट्रपतींनी देशाने केलेल्या प्रगतीचा पट मांडला. २०२१ ते २०२४ या काळात देशाने ८ टक्के आर्थिक वाढ नोंदवली असून भारत सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसल्याचे राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले. भारत जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होणार आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षात असंख्य कुटुंबं गरीबी रेषेतून वर आले असून राहिलेल्यांना गरीबी रेषेच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरीचंही राष्ट्रपतींनी कौतुक केले.

महिला आणि युवांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारने महत्व दिले असून त्यासाठी गेल्या दशकभरात अर्थसंकल्पामध्ये निधीत तीनपट वाढ करण्यात आल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. सामाजिक न्याय ही सरकारीच प्राथमिकता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समुदायांसाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले. आपल्या वैविध्यासह एकत्र येण्याचं आवाहन करत राष्ट्रपती म्हणाल्या. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

Recent Posts

Earth Day : पृथ्वीचे वाढते तापमान पर्यावरणासाठी ठरतेय धोक्याची घंटा!

वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…

5 minutes ago

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

40 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago