२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

प्रश्न सोडविण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खा. डॉ. शिंदे यांनी भेट घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊनही महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी २७ गावातील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर हे सफाई कामगार केडीएमसी प्रशासनाविरोधात निदर्शने करत असून या कामगारांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली २७ गावांच्या समस्यां सोडविण्यासाठी अनेक उपायोजना राबविण्यात येत आहे.


२७ गावांमध्ये रस्त्यांची उभारणी,मुबलक पाणी देण्यासाठी अमृत योजना यांसह अनेक उपाययोजना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार आपण राबवत आहोत. भविष्यातही या गावांसाठी कल्याणाकारी निर्णय घेण्यात येतील, असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी खा.शिंदे यांच्यासोबत स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, महेश पाटील, महेश गायकवाड, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, निलेश शिंदे, संजय पाटील,विजया पोटे, छाया वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यापूर्वी २७ गावांना भेडसावणारे मोठे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले आहेत. त्यात कर आकारणीचा प्रश्न असो की पाणी पुरवठ्याचा, हे दोन्ही प्रश्न आपण यशस्वीरीत्या सोडवले आहेत. त्याचप्रमाणे २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात आपण येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ. आणि या बैठकीत याप्रश्नी नक्कीच समाधानकारक असा तोडगा निघेल असा विश्वास खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सुरू केलेले हे कामबंद आंदोलन मागे घेत कामावरही रुजू होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल