IND vs BAN: भारत-बांग्लादेश मालिकेच्या वेळापत्रकात झाला बदल, कधी खेळवले जाणार सामने

मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात १९ सप्टेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होत आहे. या मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. मात्र आता या मालिकेत महत्त्वाचा बदल झाला आहे.


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. बीसीसीआयने सांगितले की भारत-बांग्लादेश यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आता धरमशालामध्ये खेळवला जाणार नाही. याचे आयोजन ग्वालियरमध्ये होईल.


ग्वालियरमध्ये नुकतेच नवे क्रिकेट स्टेडियम बनून तयार झाले आहे. बीसीसीआयने भारत-इंग्लंड मालिकेतही बदल केला आहे. खरंतर, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला धरमशालामध्ये खेळवला जाणार होता. मात्र येथे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला अपग्रेड करण्याचे काम सुरू आहे. याच कारणामुळे पहिला टी-२० सामना ग्वालियरमध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. ग्वालियरमध्ये श्रीमंत माधवराव सिंधिया स्टेडियम बनून तयार झाला आहे. हे या शहरातील नवे स्टेडियम आहे.



दोन कसोटी आणि तीन टी-२० सामने खेळणार बांगलादेशचा संघ


भारत-बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईमध्ये आणि दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवला जाईल. टी-२० मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये ६ ऑक्टोबरला खेळवला जाईल. तर दुसरा सामना दिल्ली आणि तिसरा सामना हैदराबादमध्ये खेळवला जाईल



भारत-इंग्लंड वेळापत्रकात बदल


भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतही बदल झाला आहे. खरंतर, इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी २०२५मध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. येथे ते पाच टी-२- आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना २२ जानेवारी आणि दुसरा २५ जानेवारीला खेळवला जाणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि दुसरा सामना कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. मात्र आता दोन्ही जागा बदलण्यात आल्या आहेत. आता पहिला सामना कोलकाता आणि दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाईल.

Comments
Add Comment

Smruti Mandhana : स्मृती मानधना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिकी महिला संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला

IPL 2026 : गुजरातचा कोलकातावर पाच गडी राखून विजय

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पाच गडी राखून पराभव केला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी

Mumbai Cricket Team : मुंबई क्रिकेट संघाचा ऐतिहासिक निर्णय; मुंबईचे खेळाडू होणार मालामाल, मिळणार लाखोंचा पगार

मुंबई :  मुंबईतून अधिकाधिक हिरे भारतीय क्रिकेट संघाला मिळावेत यासाठी मुंबई क्रिकेट संघटनेने हे महत्वपूर्ण पाऊल

IPL 2026 MI vs PBKS : "काही कठीण निर्णय घेण्याची गरज आली आहे - हार्दिक पांड्या" ; मुंबईच्या अंतर्गत वादाचा खेळावर परिणाम?

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सात गडी राखून

IPL : मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव, पंजाबचा विजय, किंग्स झाले IPL टॉपर

मुंबई : पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील अपराजित मालिका कायम राखली. गुरुवारी मुंबईच्या वानखेडे

Pat Cummins, IPL 2026 : पॅट कमिन्स आयपीएलमध्ये पुनरागमनासाठी सज्ज; गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त

मुंबई : सिडनीमध्ये नुकत्याच झालेल्या स्कॅननंतर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला कोणत्याही