बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची २४ फेब्रुवारीपासून

दहावी, बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर


पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा ८ ते १० दिवस अगोदर होणार आहेत. बारावीची लेखी परीक्षा दि. ११ फेब्रुवारी २०२५ ते दि. १८ मार्च २०२५ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.


विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दरवर्षी परीक्षेच्या तारखा ५ ते ६ महिने अगोदर जाहीर केल्या जातात. त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत होण्यासाठी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तयारीला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी यंदापासून दोन्ही परीक्षा ८-१० दिवस लवकर होत आहेत. बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. २४ जानेवारी ते दि. १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.


दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. या संभाव्य वेळापत्रकावर सूचना, हरकती मांडण्यासाठी दि. २३ ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर या सूचना पाठवायच्या आहेत. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाहीत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case: दोन महिने आधी प्रकरण बाहेर, मात्र खरातला वाचण्यासाठी कुणी ताकद लावली?

नाशिक: लैंगिक शोषण प्रकरणात नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खरातचे विकृत कारनामे समोर येऊ लागले आहेत. अशोक

Weather Update: महाराष्ट्रात २४ तासात हवानमान बदलणार, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट तर ५ जिल्ह्यांत हिटवेवटचा इशारा

मुंबई: मार्च महिन्याच्या सुरुवातीला उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र त्यानंतर तुफान गारपीट झाली. हीच गारपीट आता

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे