माणसांच्या घुसखोरीमुळे पर्यावरणातील जैव साखळीच धोक्यात

  41

प्रदेशानुसार देशात आढळतात नागराजाच्या वेगवेगळ्या छटा


प्रशांत सिनकर


ठाणे : जंगल परिसरात वन्यजीवांच्या अधिवास असला तरी माणसांच्या घुसखोरीमुळे जैव साखळीच धोक्यात आली आहे. भारतात नागाचे चार प्रमुख प्रकार असून, त्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड नाग सर्वाधिक मोठा सात फूट लांबीचा असून त्याचे आवडीचे खाद्य मासे आहे, तो शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो तर ब्लॅक कोब्रा हा नाग सर्वात विषारी आहे.


श्रावण महिन्यातील नागपंचमीला नागाचे पुजन केले जात असताना, साप माणसाचा शत्रू की मित्र हा एक कायमच संशोधनाचा विषय बनला आहे.


ठाणे मुंबईत दिसणारा चष्मेधारी नाग देशात सर्वत्र आढळतो; परंतु देशात आणखी तीन ते चार प्रकारचे नाग आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड (बंगाल नाग) साधारण सर्वात मोठा नाग असून, हा सात फूट लांबीचा आहे. पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात, त्याच्या आवडीचे खाद्य मासे असून उंदीर, घुशी, बेडूक, छोटे प्राणी यांना खातो. काहीवेळा शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो. ही लाळ जखमेवर पडल्यावर विषाचा प्रादुर्भाव शरीरावर होत असल्याची माहिती सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी दिली.


सेंट्रल एशियन कोब्रा याला ब्लॅककोब्रा म्हणूनही ओळखले जाते. हा नागांमध्ये सर्वाधिक विषारी नाग असून, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू, राजस्थान, दार्जिलिंग आदी भागात आढळतो. तर अंदमान कोब्रा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर सफेद आडवे पट्टे असतात.


किंगकोब्रा (नागराज) हा नागासारखा दिसतो. मात्र नागकुळातला नाही. विषारी सापात हा सर्वात लांब असून सुमारे १२ ते १८ फूट लांबीचा आहे. गोव्यापासून सर्व दक्षिण भारत आणि पूर्व भारतात आढळतो.


नागाच्या मिलनाच्या वेळी नागीण विशिष्ट स्राव सोडून पुढे जात असते. स्त्रावाचा मागोवा घेत नाग पाठीमागून येत असतो, या काळात नागीणीला मारले तर त्या स्त्रावाच्या शोधात नाग येतो आणि आपल्याला वाटते नागाने डुक धरला. नागाला पाच ते सहा फुटांपर्यंत दिसते. नागाच्या डोक्यावर एखादी गाठ झाली असेल तर ही गाठ म्हणजे नागमणी असल्याची काहींची समजूत आहे, असे ठाणयातील सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी म्हटले.

Comments
Add Comment

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची