ठाणे : जंगल परिसरात वन्यजीवांच्या अधिवास असला तरी माणसांच्या घुसखोरीमुळे जैव साखळीच धोक्यात आली आहे. भारतात नागाचे चार प्रमुख प्रकार असून, त्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड नाग सर्वाधिक मोठा सात फूट लांबीचा असून त्याचे आवडीचे खाद्य मासे आहे, तो शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो तर ब्लॅक कोब्रा हा नाग सर्वात विषारी आहे.
श्रावण महिन्यातील नागपंचमीला नागाचे पुजन केले जात असताना, साप माणसाचा शत्रू की मित्र हा एक कायमच संशोधनाचा विषय बनला आहे.
ठाणे मुंबईत दिसणारा चष्मेधारी नाग देशात सर्वत्र आढळतो; परंतु देशात आणखी तीन ते चार प्रकारचे नाग आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड (बंगाल नाग) साधारण सर्वात मोठा नाग असून, हा सात फूट लांबीचा आहे. पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात, त्याच्या आवडीचे खाद्य मासे असून उंदीर, घुशी, बेडूक, छोटे प्राणी यांना खातो. काहीवेळा शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो. ही लाळ जखमेवर पडल्यावर विषाचा प्रादुर्भाव शरीरावर होत असल्याची माहिती सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी दिली.
सेंट्रल एशियन कोब्रा याला ब्लॅककोब्रा म्हणूनही ओळखले जाते. हा नागांमध्ये सर्वाधिक विषारी नाग असून, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू, राजस्थान, दार्जिलिंग आदी भागात आढळतो. तर अंदमान कोब्रा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर सफेद आडवे पट्टे असतात.
किंगकोब्रा (नागराज) हा नागासारखा दिसतो. मात्र नागकुळातला नाही. विषारी सापात हा सर्वात लांब असून सुमारे १२ ते १८ फूट लांबीचा आहे. गोव्यापासून सर्व दक्षिण भारत आणि पूर्व भारतात आढळतो.
नागाच्या मिलनाच्या वेळी नागीण विशिष्ट स्राव सोडून पुढे जात असते. स्त्रावाचा मागोवा घेत नाग पाठीमागून येत असतो, या काळात नागीणीला मारले तर त्या स्त्रावाच्या शोधात नाग येतो आणि आपल्याला वाटते नागाने डुक धरला. नागाला पाच ते सहा फुटांपर्यंत दिसते. नागाच्या डोक्यावर एखादी गाठ झाली असेल तर ही गाठ म्हणजे नागमणी असल्याची काहींची समजूत आहे, असे ठाणयातील सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी म्हटले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…