मुंबई: असं म्हटलं जातं की एकमेकांच्या उष्टाचे खाल्ल्याने प्रेम वाढतो. अनेकदा घरातील लोक एकमेकांची थाळी शेअर करतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की उष्टे खाल्ल्याने प्रेम वाढतेच मात्र अनेक आजारांचा धोकाही वाढतो. याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होता. आरोग्य तज्ञांच्या मते कोणाच्याही उष्ट्याचे अन्न खाऊ नये. यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.
इन्फेक्शनची भीती
जेव्हा आपण एकाच थाळीत एकमेकांच्य उष्ट्याचे अन्न खातो तेव्हा इन्फेक्शनचा धोका वाढतो. जर तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीचे उष्टे अन्न खात असाल तर हे धोकादायक आहे. सर्दी, ताप अथवा पोटाचा त्रास असलेल्या व्यक्तीचे उष्टे अन्न खाल्ल्यास त्रास होऊ शकतो.
पचनाचा त्रास
जेव्हा तुम्ही एकाच थाळीमध्ये एकमेकांचे उष्टे अन्न खात असता यामुळे खाण्यातून पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
पोषकतत्वांची कमतरता
जेव्हा आपण दुसऱ्या थाळीमध्ये त्याच्यासोबत अन्न खात असतो तेव्हा शरीराला पुरेशा प्रमाणात पोषकतत्वे मिळत नाही. शरीराला संपूर्ण पोषण मिळत नाही.
अॅलर्जीची समस्या
जेव्हा आपण एकमेकांच्या उष्ट्याचे खात असलो तर अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. तुम्ही आजारीही पडू शकता.