ठाणे : बदलत्या वातावरणाचा त्रास माणसांबरोबर पशुपक्ष्यांना होत असून, त्याचे पडसाद आता समुद्र पक्ष्यांना सोसावे लागत आहेत. खोल समुद्रात वावरणारे पक्षी आता भरकटत ठाणे खाडी परिसरात दिसून येऊ लागले आहेत. अरबी समुद्राच्या मध्य भागात वावरणारा ब्रायडल्ड टर्न हा पक्षी ऐरोली खाडी भागात विहार करताना दिसून आल्याने पक्षी अभ्यासकांचे डोळे चक्रावले आहेत.
राज्यात पावसाच्या मुसळधार सरी बरसत असताना, दुसरीकडे मुंबई-ठाणे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. अरबी समुद्रात लाटांचा वेग देखील वाढल्याचे दिसून येते. मात्र याचा विपरीत परिणाम पक्ष्यांवर झाला आहे. समुद्र किनाऱ्यापासून कित्येक किलोमीटर आतमध्ये भिरभिरणारे पक्षी वादळी वाऱ्याने किनारपट्टीवर फेकले जात आहेत.
वाऱ्याच्या प्रचंड वेगाने त्यांचा अधिवास सोडून दुसरीकडे जावे लागत आहे. असाच ब्रायडल्ड टर्न हा पक्षी ऐरोली येथील खाडीत उडताना दिसून आला असल्याची माहिती पक्षी अभ्यासक शाहिद बामणे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून समुद्रात ताशी ४० ते ५० किमीने वारे वाहत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार समुद्र देखील खवळलेला बघायला मिळाला. मात्र अशातच समुद्रात दिसणारे पक्षी भरकटून मुंबई ठाणे किनारपट्टीवर दिसून आले आहे. ब्रायडल्ड टर्न पक्ष्याला मराठीत ‘लगाम सुरय’ या नावाने ओळखले जाते. पक्षी साधारण एक फूट लांबीचा असून, हा खोल समुद्रात दिसणारा पक्षी छोटे अथवा मेलेल्या माश्यांवर ताव मरतो. विणीच्या हंगामात समुद्रातील निर्जन बेटावर पिल्लांचे संगोपन करतो, असे पक्षीतज्ज्ञ अविनाश भगत यांनी सांगितले.
तसेच वादळी वाऱ्याने माणसाच्या सहवासापासून खूप दूरवर असणारे पक्षी मुंबई-ठाणे रायगड व पालघर सागरी खाडी किनाऱ्यावर दिसून येत आहेत. Bridled Tern (लगाम सुरय), Lesser Noddy (छोटा डोलमान्या) यासारखे सात आठ प्रकारचे दुर्मीळ समुद्र पक्षी दिसून येत आहेत. बोटीतून प्रवास करताना हे पक्षी समुद्रात विहार करताना दिसतात, असे ठाण्यातील पक्षी अभ्यासक, प्रतीक कुलकर्णी यांनी म्हटले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…