Wardha Accident : वर्ध्यात ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार


वर्धा : राज्यभरात अपघातांच्या घटनांमध्ये (Accident news) सातत्याने होत असलेली वाढ चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता वर्ध्यामधून एक भीषण अपघाताची (Wardha Accident) बातमी समोर आली आहे. नागपूर मुंबई महामार्गावर (Nagpur Mumbai Highway) एका ट्रकने रिक्षाला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मुंबई महामार्गावरुन रिक्षाचालकासह सात जणांना घेऊन रिक्षा पुलगावकडे जात होती. आठवडी बाजारात खरेदीसाठी हे सर्वजण निघाले होते. यावेळी केळापूर शिवारात समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर दुर्गाबाई मसराम व सतीश नेहारे या दोघांचा जागीच अंत झाला. भीमराव पाटील व सुनीता कौराती यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह तीन जण गंभीर जखमी झाले.


याबाबतची माहिती मिळताच केळापूर येथील पोलीस पाटील रोशन भोवटे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असलेल्या तिघांची जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला असून पुलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेने केळापूर गावावर शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड हादरले : मणक्याचे ऑपरेशन झालेल्या महिलेचा डॉक्टराकडूनच विनयभंग!

पिंपरी-चिंचवड : वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील (Pimapari- Chinchwad) आकुर्डी (Akurdi)

Ahilyanagar : जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ! पाणीसाठा घसरला अवघ्या २४.५४ टक्क्यांवर

अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने जूनच्या पहिल्याच आठवड्यात तळ गाठला असून, एकूण साठा

IAF Officer Wife Video : धक्कादायक! हवाई दल अधिकाऱ्याच्या पत्नीचा बलात्कार, ब्लॅकमेल आणि सक्तीच्या धर्मांतराचा आरोप

नागपूर : नागपुरात (Nagpur) एका २४ वर्षीय महिलेने तिच्या जुन्या वर्गमित्रासह तिघांविरुद्ध बलात्कार (Rape), ब्लॅकमेल (Blackmail),

Pratap Sarnaik : आता प्रत्येक ५० किलोमीटरवर 'आरटीओ ऑफिस'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

- कमी लोकसंख्येच्या ठिकाणी चार तालुक्यांना एकत्र सेवा मुंबई : राज्यातील वाढती वाहनसंख्या आणि नागरिकांची गरज

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान

CNG Price Hike : पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका! सीएनजी १ रुपयाने महाग; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

पुणे : पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहनचालकांना मोठा